शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:13 IST

अहिल्यानगरमध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीने मेहुण्याचा खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड झालं.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगरच्या  ४ बहिणींवरील अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. बलात्काराचा तपास सुरू असतानाच खुनाचा गुन्हा उघड झाल्याने खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी बजरंग साळुंके याने बायकोच्या भावाचाही खून केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. पोलिसांनी त्याला दवणगाव शिवारात नेल्यानंतर त्याने सहा महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरून बाहेर काढला. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी मृतदेहाची जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली.

दवणगावच्या बजरंग साळुंके याने चार महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. या अल्पवयीन मुली त्याच्या दूरच्या नातेवाईक होत्या. मुलींचे आई-वडील विभक्त झाल्याने त्यांनी त्यांच्या चार मुलींना साळुंकेकडे ठेवले होते. दरम्यान त्यातील एकीचे लग्न झाले. तीन मुली साळुंके व त्याची पत्नी शीतल साळुंके (वय ४०) हिच्याकडे राहत होत्या. याशिवाय साळुंकेचा मेहुणा नीलेश सारंगधर (३२) हाही त्यांच्याकडेच राहण्यास होता.

तीनही मुलींवर आरोपी साळुंके याने वेळोवेळी अत्याचार केला. याची माहिती या मुलींनी त्यांच्या विवाहित मोठ्या बहिणीला दिली. या प्रकरणी पीडित मुलींनी 'स्नेहालया'च्या मदतीने १७ सप्टेंबर २०२५ रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी बजरंग साळुंके व त्याला मदत केल्याप्रकरणी त्याची पत्नी शितल साळुंके या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणात साळुंकेचा मेहुणा निलेश सारंगधर याच्यावरही गुन्हा दाखल होता. त्यामुळे पोलीस त्याचाही शोध घेत होते.

मात्र बजरंग साळुंके याने कोठडीत असताना चौकशीदरम्यान मेहुणा निलेश सारंगधर याचा खून केल्याची कबुली दिली. सारंगधर हाही या मुलींवर अत्याचार करत होता. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी भर दिवसा सारंगधर याचा बजरंग याने गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीच्या मदतीने घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरले. पोलिसांनी मंगळवारी बजरंग साळुंके याला दवणगाव शिवारात आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली व मृतदेह बाहेर काढला.

बजरंग साळुंके याने पीडित मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी मेहुण्याचा खून केला होता. घटनेला सहा महिने उलटून गेले तरीही मेहुणा नीलेश सारंगधर याच्याबाबत साधी बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल नव्हती. कारण सारंगधर याचे आई-वडील मयत झाल्याने तो बहीण शितल साळुंके हिच्याकडेच राहत होता. त्यामुळे यात कोणीही तक्रार केली नाही. मात्र अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणामुळे खुनाचे हे प्रकरण समोर आले.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस