शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:49 IST

Bengaluru Techie Death News: निखिल शिक्षणात खूप हुशार होता. त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बिझनेस एनालिटिक्स मॅनेजमेंट शिक्षण पूर्ण केले होते

बंगळुरू - ओलाची एआय कंपनी कृत्रिममध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. कंपनीत कामाच्या प्रेशरमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले आहे. ८ मे रोजी ही घटना घडली. निखिल सोमवंशी नावाच्या इंजिनिअरचा मृतदहे सापडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. ऑगस्ट २०२४ मध्ये निखिलने कंपनी ज्वाईन केली होती. 

निखिलच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी रेडिटवर एका पोस्टच्या माध्यमातून झाली. या पोस्टमध्ये म्हटलं होते की, निखिलवर कामाचे खूप जास्त प्रेशर होते. ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. रेडिटची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात लोकांनी ओलाच्या कृत्रिममध्ये कामाच्या वातावरणावरून संताप व्यक्त केला आहे. तिथे काम करण्याची पद्धत खूप टॉक्सिक असल्याचा आरोप नेटिझन्सने केला आहे. 

शिक्षणात हुशार होता निखिल

निखिल शिक्षणात खूप हुशार होता. त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बिझनेस एनालिटिक्स मॅनेजमेंट शिक्षण पूर्ण केले होते. कृत्रिममध्ये ज्वाईन होण्यापूर्वी निखिलने नॅचुरल लॅग्वेंज प्रोसेसिंग इंजिनिअर केले होते. २०२४ मध्ये सुरुवातीचे सहा महिने त्याने इंटर्नशिप केली. त्याच्या काही सहकाऱ्यांनी निखिलवर कामाचा दबाव टाकला. राजकिरण पानुगंटी नावाच्या मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून अनेक सहकाऱ्यांनी नोकरी सोडली होती. 

एका रेडिट युजरने म्हटलं की, पानुगंटी नव्या कर्मचाऱ्यांसोबत वाईट पद्धतीने वागत असे. ऑफिसमध्ये भीतीदायक वातावरण बनवले होते. त्यामुळे बरेच जण नोकरी सोडत होते. तर निखिलच्या मृत्यूने आम्ही दु:खी आहोत, पोलिसांच्या तपासात योग्य ते सहकार्य करू असं कृत्रिम कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्याशिवाय निखिल सुट्टीवर होता असेही कंपनीने म्हटलं. ८ एप्रिलला निखिलने मॅनेजरशी संवाद साधला. त्याला आरामाची गरज आहे असं त्याने सांगितले तेव्हा त्याला सुट्टी देण्यात आली होती. १७ एप्रिलला त्याला बरे वाटू लागले. मात्र आणखी आरामाची गरज असल्याने सुट्टी वाढवून घेतली असा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर मॅनेजरबाबत तक्रार सांगितली. तो ज्यूनिअर कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देतो. मॅनेजरच्या वर्क प्रेशरमुळे अनेकजण नोकरी सोडून गेलेत. काहींनी तर दुसरी नोकरी मिळण्याच्या आधीच कंपनीतून राजीनामा देणे पसंत केले. कर्मचाऱ्यांचा अपमान करणे, त्याला नको ते बोलणे, यामुळे कर्मचारी त्याच्या वर्तवणुकीला कंटाळलेत असा आरोप कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केला.

टॅग्स :OlaओलाBengaluruबेंगळूरDeathमृत्यूEmployeeकर्मचारीITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्य