शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"आम्हाला तर ट्रकचं वाटलं"; फायटर जेटचं चोरी केलेलं टायर चोरांनी आणून दिलं परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 10:49 IST

मिराज २००० आणि लढाऊ जेटचे नवे टायर्स आणि हवाई दलाची उपकरणं जोधपूर एअरबेसपर्यंत नेण्यात येत होती.

२७ नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये चालत्या ट्रकमधून भारतीय हवाई दलाच्या (IAF) मिराज लढाऊ विमानाचं चोरीला गेलेलं टायर सापडलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. टायर लखनऊच्या बक्षी का तालब एअरफोर्स स्टेशनवरून राजस्थानमधील जोधपूर एअरबेसमध्ये नेलं जात होतं. दोन जण ४ डिसेंबर रोजी बक्षी का तालाब एअर फोर्स स्टेशनवर टायर घेऊन आले आणि ज्या ठिकाणी चोरीची तक्रार दाखल झाली होती त्या ठिकाणी रस्त्यावर त्यांना ते सापडल्याचं पोलिसांनी निवेदनात म्हटलं. त्याचवेळी ट्रकचा टायर समजून घरी नेल्याचं त्यांनी सांगितलं. एअर फोर्स स्टेशनने पुष्टी केली आहे की टायर त्यांच्या सप्लाय डेपोचा होता आणि ते मिराज जेटचे होते. लखनौच्या शहीद पथ परिसरात मिराज-2000 (IAF फायटर जेट्स) फायटर जेट्स आणि हवाई दलाच्या इतर उपकरणांच्या नवीन टायर्सची खेप बक्षी का तालाब एअरफोर्स स्टेशनवरून जोधपूर एअरबेसकडे नेली जात असताना ही चोरी झाली. चोरीनंतर ट्रक चालकाने लखनौ पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. शहरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना थोडावेळ थांबल्याचं त्यानं सांगितलं. त्याचवेळी ही चोरी झाली.

टॅग्स :airforceहवाईदलCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश