शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मी भांग पितोय, मग म्हणाला मी अफू खातोय! भाजपा आमदाराचं पोलिसांना अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:30 IST

Rajasthan Police : भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. 

जयपूर - बुधवारी राजस्थान विधानसभेत पोलीस आणि तुरुंग विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनीपोलिसांच्या वागणुकीवरून सरकारला घेरले. यावेळी भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. 

दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, मी अफू खातोय, असे उत्तर पोलीस अधिकाऱ्याने देणं हे आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिस आरोपींना वाचवण्याचे काम करतात.राजेंद्र राठोड म्हणाले, राजस्थानमध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढत आहेभाजप विधिमंडळ पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. ३९ टक्के महिला अत्याचार खोटे असल्याचे पोलीस महासंचालक सांगतात. त्यांनी महिलांवरच प्रश्न उपस्थित केले. महिलांवरील अत्याचाराचे १.१५ लाख गुन्हे दाखल झाले आहेत. दरवर्षी १७ हजार ६४५ बलात्कार होतात. राजस्थानमध्ये दररोज १८ बलात्कार होतात. राठोड म्हणाले की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, राजस्थान गुन्ह्यांच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचले आहे. पुढे राठोड म्हणाले की, गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०२१ मध्ये १७८६ खून झाले होते, मात्र ९२९ हत्येचा गुंता सुटला असून 384 खुनाचे तपास प्रलंबित आहेत.मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार म्हणाले, पोलिसांच्या संगनमताने दारूची तस्करी होतेमुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार संयम लोढा म्हणाले की, पोलिसांच्या संगनमताने दारूची तस्करी होते. सिरोही जिल्ह्यात दारू तस्करांसह ४० पोलिसांची मिलीभगत असल्याचं समोर आली, मात्र कारवाई झाली नाही. संजय शर्मा यांनी अल्वरमधील मूकबधिर अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार झाल्याबाबत सहमती दर्शवली, परंतु पोलीस अधीक्षकांनी ते नाकारले. पोलिस अधीक्षकांनी तीनदा जबाब बदलले. सरकारच्या दबावाखाली सामूहिक बलात्कार प्रकरण हा रस्ता अपघात असल्याचे सिद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यावरून भाजप आमदारांनी सुमारे पाच मिनिटे गोंधळ घातला.

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थानBJPभाजपाMLAआमदार