शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

गुन्ह्यांचे अर्धशतक केल्याचा मला अभिमान आहे, आरोपीचे न्यायालयात वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 9:07 PM

निर्लज्जपणे "मला माझ्या ५० व्या चोरीचा अभिमान असल्याचे" सांगितले. या आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे

मुंबई - मुंबईत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनी त्याच्या ५० व्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायाधीशांनी त्याला चोरी न करण्याचे आवाहन करत समजवण्याचा प्रयत्न केला असता. त्याने निर्लज्जपणे "मला माझ्या ५० व्या चोरीचा अभिमान असल्याचे" सांगितले. या आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे. मात्र, मंगलमध्ये सुधारण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. चोरीचे पैसे जुगारात आणि दारू पिण्यात तो उडवायचा. कांजूरमार्ग पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावर सराईत गुन्ह्यांची नोंदी बघता न्यायाधीशांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगलने निर्लजपण्णे 'आज मी गुन्ह्यांची अर्ध सेंच्युरी केल्याचे कळले. मला त्याचा अभिमान ही असल्याचे सांगितले" या नंतर न्यायाधीशांनी त्याला ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कांजूरमार्ग परिसरात राहणारा मंगल उर्फ मंगल्या कमलाकर खरात (वय २२) याने एप्रिल महिन्यात कांजूरमार्गच्या फ्रेंड्स काॅलनीतील प्रगती अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सेवा निवृत्त विजया जाधव यांच्या घरी घरफोडी केली होती. विजया यांच्या घरातून त्याने तब्बल २१ तोळे सोने चोरले होते.  या प्रकरणी विजया यांनी कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. अशाच घरफोडीच्या गुन्ह्यात मंगलला पवई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा ताबा कांजूरमार्ग पोलिसांनी घेतला. पोलिस तपासात मंगलवरील हा ५० वा गुन्हा असल्याचे निदर्शनास आले. मंगल विरोधात आतापर्यंत पवई, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड आणि इतर पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाPoliceपोलिसCourtन्यायालय