शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

"माझी बायको मला खूप मारते, संशय घेते, आता मी वैतागलोय", पत्नी पीडित नवऱ्याने मांडली व्यथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:10 IST

Husband And Wife : महिला हेल्पलाईनवर पीडित पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. एका पुरुषाने आपल्या पत्नीविरोधात तक्रार केली आहेत. महिला हेल्पलाईनकडे आपली व्यथा मांडली.

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अनेकदा काही प्रकरणांमध्ये महिलांना त्रास दिला जातो. महिलांचा होणार छळ रोखण्यासाठी, महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी महिला हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता या महिला हेल्पलाईनवर पीडित पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. बिहारच्या पाटणामध्ये अशीच एक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या नवऱ्याने महिला हेल्पलाईनकडे धाव घेतली आहे.

एका पुरुषाने आपल्या पत्नीविरोधात तक्रार केली आहेत. महिला हेल्पलाईनकडे आपली व्यथा मांडली. मी माझ्या पत्नीला वैतागलो आहे. ती मला मारते. संशय घेते. काय करू काहीच समजत नाही असं म्हणत त्याने महिला हेल्पलाइनकडे दाद मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, "माझी बायको मला खूप मारते. तिच्या मनासारखं काही झालं नाही तर ती वाटेल ते करते. छोट्या छोट्या कारणावरून संशय घेते. दिवसभर माझ्यावर नजर ठेवते. तिच्या शिकवण्यानुसार मुलंही माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आता तर तिने मोबाईलही हॅक केला आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलतो हे तिला माहिती होतं" असं पतीने म्हटलं आहे. 

"फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे"

महिला हेल्पलाईनने पतीची व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्याच्या पत्नीचीही बाजू ऐकली. पत्नीने "माझा नवरा रिअल इस्टेटचं काम करतो. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो माझ्याकडे लक्ष देत नाही. फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे" असं म्हटलं आहे. दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांनी नवरा-बायकोला दहा दिवसांची वेळ दिली आहे. या कालावधीत त्यांनी त्यांना असलेल्या समस्यांवर तोडगा काढावा असं म्हटलं आहे.

काहीतरी मार्ग काढावा असं सांगितलं आहे. मात्र तरी देखील त्यांच्यातील वाद मिटले नाहीत आणि असंच कायम राहिलं तर मग महिला हेल्पलाईन पुढील कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर तब्बल पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना रतननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.

नात्याला काळीमा! लग्नाचं आमिष दाखवून अपहरण, 5 वर्षे केला बलात्कार: तरुणीने सांगितला धक्कादायक प्रकार

लग्नाच्या आमिष दाखवत आरोपीने आणि त्याच्या मित्रांनीही तरुणीवर पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये 22 वर्षीय तरुणीचे तिचा जवळचा नातेवाईक असलेल्या ओम प्रकाश याने लग्नाचं आमिष दाखवून अपहरण केलं होतं. तिला त्याने जयपूरला नेले. तेथील एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांनी तरुणी गरोदर राहिली. आरोपीने तिला धमकावून गर्भपात करून घेतला. तक्रारीनुसार, ओम प्रकाशच्या भूलथापांना बळी पडलेली तरूणी तीन वेळा गरोदर राहिली. मात्र, तिन्ही वेळेला गर्भपात करून घेतला. आरोपी ओम प्रकाश काही दिवसांनी पसार झाला. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी