शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"माझी बायको मला खूप मारते, संशय घेते, आता मी वैतागलोय", पत्नी पीडित नवऱ्याने मांडली व्यथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:10 IST

Husband And Wife : महिला हेल्पलाईनवर पीडित पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. एका पुरुषाने आपल्या पत्नीविरोधात तक्रार केली आहेत. महिला हेल्पलाईनकडे आपली व्यथा मांडली.

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अनेकदा काही प्रकरणांमध्ये महिलांना त्रास दिला जातो. महिलांचा होणार छळ रोखण्यासाठी, महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी महिला हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता या महिला हेल्पलाईनवर पीडित पुरुषांच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. बिहारच्या पाटणामध्ये अशीच एक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या नवऱ्याने महिला हेल्पलाईनकडे धाव घेतली आहे.

एका पुरुषाने आपल्या पत्नीविरोधात तक्रार केली आहेत. महिला हेल्पलाईनकडे आपली व्यथा मांडली. मी माझ्या पत्नीला वैतागलो आहे. ती मला मारते. संशय घेते. काय करू काहीच समजत नाही असं म्हणत त्याने महिला हेल्पलाइनकडे दाद मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, "माझी बायको मला खूप मारते. तिच्या मनासारखं काही झालं नाही तर ती वाटेल ते करते. छोट्या छोट्या कारणावरून संशय घेते. दिवसभर माझ्यावर नजर ठेवते. तिच्या शिकवण्यानुसार मुलंही माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आता तर तिने मोबाईलही हॅक केला आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलतो हे तिला माहिती होतं" असं पतीने म्हटलं आहे. 

"फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे"

महिला हेल्पलाईनने पतीची व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्याच्या पत्नीचीही बाजू ऐकली. पत्नीने "माझा नवरा रिअल इस्टेटचं काम करतो. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो माझ्याकडे लक्ष देत नाही. फोन केला तरी बिझी येतो. त्यामुळे मी माझ्या पतीला वैतागले आहे" असं म्हटलं आहे. दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांनी नवरा-बायकोला दहा दिवसांची वेळ दिली आहे. या कालावधीत त्यांनी त्यांना असलेल्या समस्यांवर तोडगा काढावा असं म्हटलं आहे.

काहीतरी मार्ग काढावा असं सांगितलं आहे. मात्र तरी देखील त्यांच्यातील वाद मिटले नाहीत आणि असंच कायम राहिलं तर मग महिला हेल्पलाईन पुढील कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर तब्बल पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना रतननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.

नात्याला काळीमा! लग्नाचं आमिष दाखवून अपहरण, 5 वर्षे केला बलात्कार: तरुणीने सांगितला धक्कादायक प्रकार

लग्नाच्या आमिष दाखवत आरोपीने आणि त्याच्या मित्रांनीही तरुणीवर पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये 22 वर्षीय तरुणीचे तिचा जवळचा नातेवाईक असलेल्या ओम प्रकाश याने लग्नाचं आमिष दाखवून अपहरण केलं होतं. तिला त्याने जयपूरला नेले. तेथील एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांनी तरुणी गरोदर राहिली. आरोपीने तिला धमकावून गर्भपात करून घेतला. तक्रारीनुसार, ओम प्रकाशच्या भूलथापांना बळी पडलेली तरूणी तीन वेळा गरोदर राहिली. मात्र, तिन्ही वेळेला गर्भपात करून घेतला. आरोपी ओम प्रकाश काही दिवसांनी पसार झाला. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी