शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

दुर्देवी! पत्नी, मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या; बंद घरात ५ मृतदेह सापडले; धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:24 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील जयरामपूर गावात आज पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तीन मुलांची हत्या केली. यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सकाळी घरामध्ये मृतदेह पडलेला पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

हुंड्यामध्ये मागितली 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख; न मिळताच पतीने दिला ट्रिपल तलाक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्मा यांनी बुधवारी सकाळी  पत्नी राधिका (३५) हिला बेदम मारहाण केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन निष्पाप मुलांचीही हत्या केली. मोठी मुलगी निकिता, मुलगा आदर्श आणि तीन वर्षांची मुलगी आयुषीची हत्या केल्यानंतर आरोपी नागेश (३७) याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता घरात एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. पत्नीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळल्याचे दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एसपी अजय पाल शर्मा यांनीही तपास केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून घटनेचा तपास करत आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेश विश्वकर्माने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. आरोपींनी हे का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस