शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

दुर्देवी! पत्नी, मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या; बंद घरात ५ मृतदेह सापडले; धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:24 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील जयरामपूर गावात आज पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तीन मुलांची हत्या केली. यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सकाळी घरामध्ये मृतदेह पडलेला पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

हुंड्यामध्ये मागितली 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख; न मिळताच पतीने दिला ट्रिपल तलाक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्मा यांनी बुधवारी सकाळी  पत्नी राधिका (३५) हिला बेदम मारहाण केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन निष्पाप मुलांचीही हत्या केली. मोठी मुलगी निकिता, मुलगा आदर्श आणि तीन वर्षांची मुलगी आयुषीची हत्या केल्यानंतर आरोपी नागेश (३७) याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता घरात एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. पत्नीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळल्याचे दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एसपी अजय पाल शर्मा यांनीही तपास केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून घटनेचा तपास करत आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेश विश्वकर्माने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. आरोपींनी हे का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस