शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

दुर्देवी! पत्नी, मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या; बंद घरात ५ मृतदेह सापडले; धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:24 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील जयरामपूर गावात आज पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तीन मुलांची हत्या केली. यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सकाळी घरामध्ये मृतदेह पडलेला पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

हुंड्यामध्ये मागितली 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख; न मिळताच पतीने दिला ट्रिपल तलाक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्मा यांनी बुधवारी सकाळी  पत्नी राधिका (३५) हिला बेदम मारहाण केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन निष्पाप मुलांचीही हत्या केली. मोठी मुलगी निकिता, मुलगा आदर्श आणि तीन वर्षांची मुलगी आयुषीची हत्या केल्यानंतर आरोपी नागेश (३७) याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता घरात एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. पत्नीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळल्याचे दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एसपी अजय पाल शर्मा यांनीही तपास केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून घटनेचा तपास करत आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेश विश्वकर्माने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. आरोपींनी हे का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस