शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दुर्देवी! पत्नी, मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या; बंद घरात ५ मृतदेह सापडले; धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:24 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील जयरामपूर गावात आज पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तीन मुलांची हत्या केली. यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सकाळी घरामध्ये मृतदेह पडलेला पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

हुंड्यामध्ये मागितली 7 सीटर आलिशान कार आणि 10 लाख; न मिळताच पतीने दिला ट्रिपल तलाक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्मा यांनी बुधवारी सकाळी  पत्नी राधिका (३५) हिला बेदम मारहाण केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन निष्पाप मुलांचीही हत्या केली. मोठी मुलगी निकिता, मुलगा आदर्श आणि तीन वर्षांची मुलगी आयुषीची हत्या केल्यानंतर आरोपी नागेश (३७) याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता घरात एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. पत्नीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळल्याचे दिसत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एसपी अजय पाल शर्मा यांनीही तपास केला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून घटनेचा तपास करत आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेश विश्वकर्माने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. आरोपींनी हे का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस