शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हृदयद्रावक... दोन चिमुकल्यांसमोर आईचा वांद्रे स्थानकात अपघातात झाला दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:46 IST

कस्तुरबा पोलीस ठाण्यात होती मिसिंग तक्रार दाखल

मुंबई - काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकावर अतिशय दुर्दैवी असा अपघात घडला. या अपघातात दोन चिमुकल्यांसमोरच लोकलखाली येऊन आईचा दोन तुकडे होऊन मृत्यू झाला आहे. विरार जलद लोकलखाली येऊन प्रीती राजेश गुप्ता (वय - २५) या महिलेचा मृत्यू झाला. या लोकलमधील प्रवाश्यांनी देखील हळहळ व्यक्त करत त्यांना देखील अश्रू आवरले नाहीत. याबाबत वांद्रे रेल्वे पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद असून किरकोळ जखमी झालेल्या दोन चिमुरड्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी दिली. 

काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चर्चगेटहून विरारला जाणारी जलद लोकल वांद्रे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर येत असताना चर्चगेटच्या दिशेने हा अपघात झाला. मात्र,  रुळ ओलांडताना की लोकल पकडत असताना हा अपघात झाला हे अजून निष्पन्न झालेले नाही असे जाधव यांनी सांगितले. याच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिला प्रवाश्याने  या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, अशी घटना माझ्यासाठी पहिल्यांदाच होती. मनाला वेदना देणारी घटना होती. लोकल अतिशय वेगाने दादरहून सुटली होती. मात्र, वांद्रे स्थानक येणार म्हणून थोडा वेग कमी झाला असताना आरडाओरडा ऐकू आला. कोणीतरी लोकलची साखळी घेऊन लोकल थांबवली. महिलांचा डब्ब्यातील अनेक बायका डोकावून अपघात पाहत होत्या. अपघातात महिलेचे दोन तुकडे आणि डोह फोडणारी दोन चिमुकली मुलं पाहून बायका हळव्या होऊन ओक्साबोक्शी रडत  होत्या. तर काही महिला एकमेकींना धीर देत होत्या असे तिने पुढे सांगितले. 

 वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी मयत प्रीती राजेश गुप्ता हि महिला बोरिवली येथील राहणारी असून ती हरवल्याबाबत काल कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार तिच्या पतीने दाखल केली होती. अपघातात दोन चिमुरडी मूळ सुदैवाने किरकोळ जखमी झाली आहेत. अंदाजे एक २ आणि दुसरा ४ वर्षांचा मुलगा आहे. मोठ्या मुलाच्या तोंडाला आणि चेहऱ्याला मार लागला असून लहान मुलाच्या कपाळाला, चेहऱ्याला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळाला असून लवकरच त्यांना संपर्क साधू. त्यानंतर ती घर सोडून का निघाली? घरी भांडण झालं होतं का ? या प्रश्नांची उकल होईल असे जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू