शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

हृदयद्रावक... दोन चिमुकल्यांसमोर आईचा वांद्रे स्थानकात अपघातात झाला दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:46 IST

कस्तुरबा पोलीस ठाण्यात होती मिसिंग तक्रार दाखल

मुंबई - काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकावर अतिशय दुर्दैवी असा अपघात घडला. या अपघातात दोन चिमुकल्यांसमोरच लोकलखाली येऊन आईचा दोन तुकडे होऊन मृत्यू झाला आहे. विरार जलद लोकलखाली येऊन प्रीती राजेश गुप्ता (वय - २५) या महिलेचा मृत्यू झाला. या लोकलमधील प्रवाश्यांनी देखील हळहळ व्यक्त करत त्यांना देखील अश्रू आवरले नाहीत. याबाबत वांद्रे रेल्वे पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद असून किरकोळ जखमी झालेल्या दोन चिमुरड्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी दिली. 

काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चर्चगेटहून विरारला जाणारी जलद लोकल वांद्रे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर येत असताना चर्चगेटच्या दिशेने हा अपघात झाला. मात्र,  रुळ ओलांडताना की लोकल पकडत असताना हा अपघात झाला हे अजून निष्पन्न झालेले नाही असे जाधव यांनी सांगितले. याच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिला प्रवाश्याने  या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, अशी घटना माझ्यासाठी पहिल्यांदाच होती. मनाला वेदना देणारी घटना होती. लोकल अतिशय वेगाने दादरहून सुटली होती. मात्र, वांद्रे स्थानक येणार म्हणून थोडा वेग कमी झाला असताना आरडाओरडा ऐकू आला. कोणीतरी लोकलची साखळी घेऊन लोकल थांबवली. महिलांचा डब्ब्यातील अनेक बायका डोकावून अपघात पाहत होत्या. अपघातात महिलेचे दोन तुकडे आणि डोह फोडणारी दोन चिमुकली मुलं पाहून बायका हळव्या होऊन ओक्साबोक्शी रडत  होत्या. तर काही महिला एकमेकींना धीर देत होत्या असे तिने पुढे सांगितले. 

 वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी मयत प्रीती राजेश गुप्ता हि महिला बोरिवली येथील राहणारी असून ती हरवल्याबाबत काल कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार तिच्या पतीने दाखल केली होती. अपघातात दोन चिमुरडी मूळ सुदैवाने किरकोळ जखमी झाली आहेत. अंदाजे एक २ आणि दुसरा ४ वर्षांचा मुलगा आहे. मोठ्या मुलाच्या तोंडाला आणि चेहऱ्याला मार लागला असून लहान मुलाच्या कपाळाला, चेहऱ्याला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळाला असून लवकरच त्यांना संपर्क साधू. त्यानंतर ती घर सोडून का निघाली? घरी भांडण झालं होतं का ? या प्रश्नांची उकल होईल असे जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू