शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:04 IST

काही मृतदेहांच्या गळ्यात विट आणि दगड बांधून फेकण्यात आले होते. काही मृतदेहांची ओळख पटली आहे तर काहींना विना ओळख दफन करण्यात आले आहे

बांगलादेशातील ३ नद्यांमध्ये सातत्याने मृतदेह सापडत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बुरिगंगा, शीतलाक्ष्य आणि मेघना नदीतून आतापर्यंत ७५० मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं बांगलादेशातील पोलिसांनी सांगितले. त्यातील बहुतांश मृतदेह कुणाचे आहेत ते पोलिसांना माहिती नाही. नदीमधून सतत मृतदेह सापडण्याच्या घटनेमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

बांगलादेशातील मजमिन वृत्तपत्रात याबाबत सविस्तर रिपोर्ट आला आहे. माहितीनुसार, आतापर्यंत जे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत, त्यातील अनेक बॅगेत टाकून फेकलेले होते. काही मृतदेहांच्या गळ्यात विट आणि दगड बांधून फेकण्यात आले होते. काही मृतदेहांची ओळख पटली आहे तर काहींना विना ओळख दफन करण्यात आले आहे. हे सर्व मृतदेह बेपत्ता लोकांचे आहेत. हे कधी गायब झाले होते याची माहिती घेतली जात आहे. परंतु नदीमध्ये दरदिवशी २-३ मृतदेह सापडले जात आहेत. आवामी लीग सरकार असताना ही संख्या ५ हून अधिक होती. 

कुणाचे मृतदेह, कुठून टाकले जातात..? २ थेअरीची चर्चा

नदीमध्ये सापडणाऱ्या मृतदेहांमागे २ थेअरीची चर्चा आहे. पहिली म्हणजे गुंडांकडून अपहरण झालेल्या लोकांना मारून त्यांचे मृतदेह नदीत फेकले जातात. जेणेकरून हे मृतदेह कुणाला सापडू नयेत. जेव्हा पाण्यामुळे मृतदेह फुगतात तेव्हा ते बाहेर येतात आणि पोलिसांना याची भनक लागते. बांगलादेशात प्रत्येक महिन्याला ८७ लोकांचे अपहरण होते, हे आकडे २०१४ च्या तुलनेत ६१ टक्के जास्त आहेत. बांगलादेशातील सरकार अपहरण आणि त्यानंतर होणाऱ्या हत्या रोखण्यास अपयशी ठरले आहे. सरकारच्या गृह सल्लागारानेही याची कबुली दिली.

दुसरी थेअरी म्हणजे, बहुतांश मृतदेह हे शेख हसीना यांच्या कार्यकाळात नदीत फेकले होते, मानवाधिकार संस्थेने हसीना सरकारमध्ये ७०० लोक गायब झाले होते. हे लोक कुठे गेले, कसे मारले गेले याची माहिती आताच्या युनूस सरकारलाही मिळाली नाही. या प्रकाराचे फारसे गांभीर्य पोलीस घेत नाहीत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. २००८ ते २०२४ या काळात बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार होते. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश