शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:04 IST

काही मृतदेहांच्या गळ्यात विट आणि दगड बांधून फेकण्यात आले होते. काही मृतदेहांची ओळख पटली आहे तर काहींना विना ओळख दफन करण्यात आले आहे

बांगलादेशातील ३ नद्यांमध्ये सातत्याने मृतदेह सापडत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बुरिगंगा, शीतलाक्ष्य आणि मेघना नदीतून आतापर्यंत ७५० मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं बांगलादेशातील पोलिसांनी सांगितले. त्यातील बहुतांश मृतदेह कुणाचे आहेत ते पोलिसांना माहिती नाही. नदीमधून सतत मृतदेह सापडण्याच्या घटनेमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

बांगलादेशातील मजमिन वृत्तपत्रात याबाबत सविस्तर रिपोर्ट आला आहे. माहितीनुसार, आतापर्यंत जे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत, त्यातील अनेक बॅगेत टाकून फेकलेले होते. काही मृतदेहांच्या गळ्यात विट आणि दगड बांधून फेकण्यात आले होते. काही मृतदेहांची ओळख पटली आहे तर काहींना विना ओळख दफन करण्यात आले आहे. हे सर्व मृतदेह बेपत्ता लोकांचे आहेत. हे कधी गायब झाले होते याची माहिती घेतली जात आहे. परंतु नदीमध्ये दरदिवशी २-३ मृतदेह सापडले जात आहेत. आवामी लीग सरकार असताना ही संख्या ५ हून अधिक होती. 

कुणाचे मृतदेह, कुठून टाकले जातात..? २ थेअरीची चर्चा

नदीमध्ये सापडणाऱ्या मृतदेहांमागे २ थेअरीची चर्चा आहे. पहिली म्हणजे गुंडांकडून अपहरण झालेल्या लोकांना मारून त्यांचे मृतदेह नदीत फेकले जातात. जेणेकरून हे मृतदेह कुणाला सापडू नयेत. जेव्हा पाण्यामुळे मृतदेह फुगतात तेव्हा ते बाहेर येतात आणि पोलिसांना याची भनक लागते. बांगलादेशात प्रत्येक महिन्याला ८७ लोकांचे अपहरण होते, हे आकडे २०१४ च्या तुलनेत ६१ टक्के जास्त आहेत. बांगलादेशातील सरकार अपहरण आणि त्यानंतर होणाऱ्या हत्या रोखण्यास अपयशी ठरले आहे. सरकारच्या गृह सल्लागारानेही याची कबुली दिली.

दुसरी थेअरी म्हणजे, बहुतांश मृतदेह हे शेख हसीना यांच्या कार्यकाळात नदीत फेकले होते, मानवाधिकार संस्थेने हसीना सरकारमध्ये ७०० लोक गायब झाले होते. हे लोक कुठे गेले, कसे मारले गेले याची माहिती आताच्या युनूस सरकारलाही मिळाली नाही. या प्रकाराचे फारसे गांभीर्य पोलीस घेत नाहीत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. २००८ ते २०२४ या काळात बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार होते. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश