शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षित पती, थाटात लग्न, पण वेटरवर झालं प्रेम! लग्नानंतर ९० दिवसांतच पत्नीने नवऱ्याचा काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:09 IST

राजस्थानमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने लग्नानंतर तीन महिन्यातच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Rajasthan Honeymoon Murder: दोन कुटुंबांतील जुने संबंध, रक्ताची नाती आणि थाटामाटात पार पडलेल्या विवाहाच्या आनंदावर एका क्रूर कटाने विरजण घातले. श्रीगंगानगर जिल्ह्यात एका २३ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने लग्नाला केवळ तीन महिने झाले असताना पतीची हत्या केली. या घटनेने केवळ दोन्ही कुटुंबेच नव्हे, तर संपूर्ण राजस्थान सुन्न झाले आहे.

सादुलशहर येथील अंजली (वय २३) हिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी आशिष (वय २७) याच्याशी झाला होता. आशिष हा भूगर्भशास्त्रात एम.एस्सी. होता आणि बी.एड. करत होता. दुसरीकडे अंजली एम.कॉम.चे शिक्षण घेत होती. आशिषला त्याच्या काका-काकूंनी दत्तक घेतले होते आणि त्याच्या दत्तक आईनेच त्यांची भाचीशी म्हणजेच अंजलीशी) त्याचे लग्न लावून दिले होते. दोन्ही कुटुंबांत आधीपासूनच तीन लग्ने झाली होती, त्यामुळे हे नाते अत्यंत घट्ट मानले जात होते.

३० जानेवारीच्या संध्याकाळी अंजली आणि आशिष घराबाहेर फिरायला गेले होते. आशिषच्या भावाने सांगितले की, "आम्ही रोजच्या वाटेने फिरायला जातो, पण त्या दिवशी अंजलीच्या सांगण्यावरुन ते एका निर्जन रस्त्यावरून गेले. काही वेळानंतर आशिष आणि अंजली बेशुद्धावस्थेत सापडले. सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. आशिषला मृत घोषित करण्यात आले, तर अंजलीने शुद्धीवर आल्यावर आपली सोन्याची दागिने चोरीला गेल्याचे नाटक केले."

पोलिस तपासात 'लव्ह ट्रँगल' उघड

आशिषच्या शरीरावरील जखमा आणि अंजलीचे बोलणं पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. अंजलीचे लग्नापूर्वी संजू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते, जो लग्नांमध्ये वेटरचे काम करायचा. अंजलीने संजूच्या मदतीने आशिषचा काटा काढण्याचा कट रचला होता. संजू आणि त्याच्या दोन मित्रांनी झुडपात लपून आशिषवर हल्ला केला, त्याचा गळा आवळला आणि या हत्येला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला.

"तिला फाशीचीच शिक्षा द्या"; दोन्ही कुटुंबांची मागणी

या घटनेमुळे आशिषचे वडील रामरख यांना प्रचंड संतप्त झाले आहेत. "अंजलीचे वागणे नेहमी सामान्य वाटायचे. ती कुटुंबात चांगली मिसळली होती. हत्येनंतर तिने बेशुद्ध असल्याचे नाटक केले. आम्हाला तिला फाशीचीच शिक्षा मिळालेली पाहायची आहे. तिचे स्वतःचे कुटुंबही आमच्या या मागणीशी सहमत आहे."

दुसरीकडे, अंजलीच्या घरातही संतापाचे वातावरण आहे. तिचे वडील १३ वर्षांपूर्वीच वारले होते. अंजलीच्या काकांनी रडत सांगितले की, "आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. या कुटुंबाशी आमचे ५० वर्षांचे नाते आहे. आमच्या मुलीचे असे प्रेमप्रकरण असेल याची आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती. आम्हाला प्रचंड लाज वाटतेय. जर हे माहित असते, तर आम्ही लग्नाऐवजी मरणे पसंत केले असते. अंजली आणि त्या तिन्ही नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. ज्या प्रकारे आशिष तडफडून मेला, तशीच शिक्षा तिला मिळावी. तिने आम्हाला कोणालाही तोंड दाखवण्यालायक ठेवले नाही."

आशिषचे कुटुंब श्रीमंत होते आणि तो उच्चशिक्षित होता. दुसरीकडे, ज्या संजूसाठी अंजलीने ही हत्या केली, तो अशिक्षित होता आणि वेटरचे काम करून जेमतेम पोट भरायचा. एका सुशिक्षित मुलीने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीसाठी आपल्या पतीचा जीव घ्यावा, यासाठी स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी अंजली, तिचा प्रियकर संजू आणि त्याचे दोन मित्र रोहित व बादल यांना अटक केली आहे. संजूचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता, तरीही त्याने अंजलीच्या सांगण्यावरून हे टोकाचे पाऊल उचलले. संपूर्ण श्रीगंगानगरमध्ये या हनिमून मर्डरची चर्चा असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Educated Husband, Lavish Wedding, Love for Waiter: Wife Murders Him!

Web Summary : Rajasthan: A woman, three months after her lavish wedding to a well-educated man, conspired with her waiter lover to murder him. The families demand the death penalty for this betrayal and crime.
टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस