शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता मिळणार अर्थसहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:03 IST

तातडीने ५० हजाराचे अनुदान; दोन लाखांवर पोलीस कुटुंबियांना दिलासा

ठळक मुद्दे विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. पोलीस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाणार आहे.

जमीर काझीमुंबई - ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सूव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांवर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ५० हजाराची मदत दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाणार आहे.

पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार या दर्जापर्यतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत दिली जाणार आहे. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या निधी,मदती व्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना दिले आहेत.

‘ऑनड्युटी’ विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विमाच्या रक्कम तसेच पोलीस कल्याणनिधीतून विविध स्वरुपात मृताच्या वारसांना मदत दिली जाते. मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास त्यांच्या वारंसाना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रक्कमेच्या स्वरुपात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केल्या कित्येक वर्षापासून अंमलदार वर्गातून केली जात होती. मात्र त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जात नव्हता.

गेल्या महिन्यात ७ नोव्हेंबरला महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या विशेष सहाय्यता निधीच्या बैठकीमध्ये हा विषय उपस्थित झाला. त्यावेळी जायसवाल यांनी अशा प्रकारे मृत्यूमुखी पडणाऱ्या पोलिसांचे कुटुंबिय आर्थिक विवंचनेत सापडलेले असतात. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याने त्यांच्या वारसांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन या निधीतून संबंधित वारसांना सहाय्य मिळेल, त्याशिवाय शासनाकडून,विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत, वेल्फअर कल्याण निधीतून दिले जाणारे सानुग्रह ,अनुदानही निर्धारित मुदतीमध्ये दिली जावी, अशा सूचना महासंचालकांनी पोलीस घटक प्रमुखांना दिल्या आहेत.

हा निधी मृत्यूमुखी अंमलदाराच्या कायदेशीर वारसाला मिळण्यासाठी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बॅँक खातेबाबतचा सविस्तर तपशील, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावयाची आहे. त्यानंतर हा निधी संबंधित वारसदारांना दिला जाणार आहे. त्याशिवाय नक्षलग्रस्त भागात, किंवा ड्युटीवर असलेल्या ठिकाणी शत्रुंशी, समाजकंटकांबरोबर प्रतिकार करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना त्या त्या घटनेनुसार निश्चित केलेली रक्कम दिली जाणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. मात्र नैसर्गिकपणे निधन पावणाऱ्यांच्या वारसांना निर्धारित स्वरुपाशिवाय अशा कोणताही लाभ मिळत नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिल्याने बिकट प्रसंगी त्यांना थोडाफार हातभार मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. - सुबोधकुमार जायसवाल (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य) 

नक्षलग्रस्त भागात किंवा अतिरेक्यांसाठी लढताना धारार्तीथ पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना लाखोंचा निधी, त्याचप्रमाणे संबंधित अंमलदाराच्या निवृत्तीपर्यत दरमहा वेतन, पदवाढ व भत्ते दिले वारंसांना दिले जातात. मात्र, नैसर्गिक निधन पावलेल्यांना अशी कोणतीही भरीव मदत दिली जात नव्हती, त्यामुळे या निधीमुळे आता वारंसाना थोडा हातभार लाभणार आहे.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू