शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

शुभमंगल सावधान म्हणण्यापूर्वीच वधूला सोडून वर पसार, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 19:34 IST

Marriage News: विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली.

जयपूर - राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील तारपुरा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विवाहाचे विधी सुरू होते. मात्र विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली. मात्र तिला कसलीच खबर लागून न देता नवरदेव पळून गेला. दरम्यान, ऐन लग्नसोहळ्यातून वर पसार होण्यामागे हुंड्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या लोभी नवरदेवाला धडा शिकवण्यासाठी वधूने आज थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच वरावर कठोर कारवाईची मागणी केली. (Groom ran away with the procession leaving the bride amidst the wedding Hall )

मिळालेल्या माहितीनुसार तारपुरा गावातील सूरजा राम जांगिड यांची मुलगी सुभिता हिचा विवाह बुगाला गावातील रहिवासी असलेल्या अजय याच्यासोबत निश्चित झाला होता. ३ जुलै रोजी संध्याकाळी अजय याची वरात सुभिताच्या घरी आली. वऱ्हाडी मंडळींनी चहा नाश्ता घेतला. त्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमादरम्यानच वर पक्षाने हुंड्याची मागणी सुरू केली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून काढता पाय घेतला. काही वेळाने वर आणि त्याचे सहकारीही वधूला सोडून निघून गेले.

सप्तपदीच्या वेळी जेव्हा वधूच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यानंतर मागचे दोन दिवस दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र त्यातून कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेरीस वधूचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांजवळ पोहोचले. वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याबाबत आपल्याला मारहाण केली आणि शिविगाळही केली. आपण वराच्या कुटुंबीयांना खूप विनवणी केली. मात्र ते वरात घेऊन परत गेले.

दरम्यान, वधूने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षभरापासून अजय हा तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. मात्र आता तो तिला सोडून गेला आहे. या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी वधूपक्ष पोलिसांवरही आरोप करत होता. अखेरीस त्यांना पोलीस अधिक्षकांकडे धाव घ्यावी लागली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान