शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हा तर आत्महत्येचा स्टंट; पाणी अंगावर ओतून घेऊन ती करत होती आत्मदहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:55 IST

बीड जिल्ह्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे (वय - ७०) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दिले सोडून 

मुंबई -  मंत्रालयासमोर आजवर रॉकेल ओतून, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण आज एका आजीने चक्क पाणी अंगावर ओतून घेत  आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी घडली. राधाबाई साळुंखे (वय - ७०) असे या वृद्ध महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. आता त्या त्यांच्या गावाकडे जाण्यास निघाल्या असल्याची माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. 

बीड तालुक्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे यांनी आज सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर पाणी ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत ड्रामा केला आणि संबंध सुरक्षा यंत्रणा हादरून सोडल्या. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी पाण्याची बॉटल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती गंगावणे यांनी दिली. साळुंखे यांना मंत्रालयातील सुरक्षा विभागने तातडीने ताब्यात घेतले आणि मारिन ड्राईव्ह पोलिसांच्या आजींना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आजींची सुटका केली. बीड तालुक्यातील पाली येथील रहिवासी राधाबाई कुंडलिक साळुंके यांचा गावातीलच नवनाथ साहेबा साळुंके यांच्याशी जमिनीसंदर्भात वाद सुरु होता. राधाबाई साळुंके यांनी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख बीड यांच्याकडे या जमिनीसंदर्भात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जागेमध्ये पाणीपुरवठा विभागाने रस्ता व कार्यालय बांधले असून या कामी कोणतेही भूसंपादन झालेले नाही. तसेच भूसंपादन मावेजाही मिळालेला नाही. मात्र, प्रत्यक्षात साहेबा गेना साळुंके यांची ३४ गुंठे जागा संपादित झालेली असून, त्यांनी मावेजा घेतला आहे. जागा परत नावावर करण्याची विनंती राधाबाई साळुंके यांनी या अर्जात केली होती. याप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयाने तिच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच १० गुंठे जमीन देण्याचे आदेश दिले होते. भूमि अभिलेखच्या या आदेशाविरुद्ध नवनाथ साळुंके यांनी महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अपील केले होते. हे अपील राज्यमंत्र्यांनी मान्य केले. सुनावणी होऊन २५ जुलै २०१८ रोजी राधाबाई या आजींच्या विरोधात निकाल देण्यात आला होता. राज्यमंत्र्यांनी जमिनीसंदर्भात आपल्याविरुद्ध निकाल दिला म्हणून राधाबाई साळुंके यांनी मुंबईत आत्मदहन करण्याचा ड्रामा केला.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईSuicideआत्महत्याMantralayaमंत्रालयPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड