शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

वाईटातून चांगलं... 'तो' आत्महत्या करायला गेला अन् दोन वर्षांनी पालकांना 'हरवलेला' मुलगा सापडला!

By पूनम अपराज | Published: July 23, 2019 3:03 PM

पोलिसांच्या तपासातून बडोदा येथे राहणाऱ्या आई - वडिलांना आपला मुलगा परत मिळाला आहे.

ठळक मुद्देउजयकुमार परमार (१९)) याने वांद्रे - वरळी सी लिंक येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापासून तो बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने गळ्यावर आणि दोन्ही हातांवर रागाच्या भरात वार करून घेतले.

मुंबई - दोन वर्षांपासून बेपत्ता असलेला उजयकुमार परमार (१९)) याने वांद्रे - वरळी सी लिंक येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणूनच सी लिंक तैनात असलेल्या गार्डने त्याला समुद्रात उडी मारण्यापासून वाचविले आणि त्यानिमित्ताने पोलिसांच्या तपासातून बडोदा येथे राहणाऱ्या आई - वडिलांना आपला मुलगा परत मिळाला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस पुढील तपास करत असून मुलाला आई - वडिलांच्या ताब्यात सोपविले जाईल असे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाला वरपे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

वरपे यांनी पुढे सांगितले की, २०१७ साली १७ वर्षाचा असताना उजयकुमारने बडोदा येथून पळ काढून मुंबई गाठली होती. त्यापासून तो बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत येऊन अजयकुमार छोटी - मोठी कामं करून पोट भरत होता. दादर येथील एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता असून नैराश्याने त्याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करण्याचं ठरविलं. त्याप्रमाणे आज त्याने वरळी येथून वांद्रे येथे जाण्यासाठी उजयकुमारने टॅक्सी केली. वांद्रे - वरळी सी लिंकवर टॅक्सी प्रवासादरम्यान मध्येच थांबवून सी लिंकवरून समुद्रात उडी मारत असताना गार्डने त्याला अडविले. त्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने गळ्यावर आणि दोन्ही हातांवर रागाच्या भरात वार करून घेतले. याबाबत वरळी पोलिसांना माहिती मिळताच जखमी उजयकुमारला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच या मुलाची माहिती काढत असताना या मुलांबाबत बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात २०१७ साली मिसिंग तक्रार असल्याची माहिती समोर आली. मुलाच्या पालकांना आम्ही संपर्क साधला असून ते त्यांना घेऊन जातील अशी माहिती वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसBandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंकMissingबेपत्ता होणं