शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

कर्जासाठी कमी व्याजदराचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १९ लाखाचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 14:37 IST

Fruad : मुंबई येथून तिघांना  अटक : ५ लाखाची रोकड हस्तगत

ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्यांमध्ये अली मोहम्मद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई), अविनाश हनुमंत वांगडे (रा.लोकमान्य नगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा.मुलुंड, मुंबई) यांच्यासह दिल्ली येथील सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

जळगाव : दुग्धव्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील शेतकऱ्याला १९ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पदार्फाश केला असून मुंबई येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. याआधी दिल्लीच्या दोन जणांना अटक झाली होती, आता पुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून ४ लाख ९० हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अली मोहम्मद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई), अविनाश हनुमंत वांगडे (रा.लोकमान्य नगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा.मुलुंड, मुंबई) यांच्यासह दिल्ली येथील सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप विठ्ठल महाजन (४६, रा.पिंपळगाव, हरेश्वर, ता.पाचोरा) या शेतकऱ्याला दुग्धव्यवसाय सुरु करावयाचा असल्याने त्यांनी ७५ लाखाचे कर्ज काढण्यासाठी पाचोरा येथील एका बँकेशी संपर्क साधला होता, मात्र शाखा व्यवस्थापकाने इतकी रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महाजन यांना बजाज फायनान्सच्या मुंबई कायार्लयातून  व्यवस्थापक कबीर अग्रवाल बोलत असल्याचे सांगून एकाने मोबाईलवर संपर्क साधला. तुम्हाला कजर् मिळेल, मात्र त्याबदल्यात ४ लाखाची विमा पॉलीसी काढावी लागले त्याचे सर्व फायदे मिळतील तसेच ४० लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, असे सांगून चार वेळा चार बँकामध्ये १२ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन भरायला लावले. त्यानंतर मुंबई बोलावून ६ लाख रुपये घेतले. महाजन यांनी एकूण १८ लाख ४९ हजार रुपये या टोळीकडे भरले. इतकी रक्कम दिल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता.

फेब्रुवारीत दिल्ली येथून दोघांना अटकगुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी उपनिरीक्षक अंगद नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, अरविंद वानखेडे व श्रीकांत चव्हाण  यांचे पथक दिल्ली रवाना केले होते. या पथकाने दोन दिवस सापळा रचला व सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता या दोघांना तेथून अटक केली. याकामात सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांची मेहनत कामात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती, मात्र नंतर लॉकडाऊनमुळे दिल्ली जाणे शक्य झाले नाही. आता परत पथकाने  चौकशी केली असता मुंबईतून काही कॉल झाल्याचे लक्षात आल्याने  उपनिरीक्षक अंगद नेमाणे, गौरव पाटील व ललीत नारखेडे यांनी मुंबई गाठली. तेथून रविवारी अली मोहम्मद मुमताज, अविनाश हनुमंत वांगडे व रविराज शंकर डांगे  या तिघांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना जळगावात आणण्यात आले. या संशयितांकडून चार एटीएम कार्ड व ४ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकJalgaonजळगावFarmerशेतकरीPoliceपोलिस