शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:18 PM

अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा  कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला.छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली.

देशभरातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असून केंद्र सरकारने लॉकडाउनचा दुसरा टप्पा देशभरात सुरु आहे. मात्र या निर्णयामुळे परराज्यातील मजुरांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असणारे हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. २२ मार्च रोजी पहिल्यांदा २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा रोजंदारीचे सर्व मार्ग बंद होणार असल्याने अनेक मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले. अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे. आत्महत्या करणारा छाबु हा मानसिक तणावात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला. मात्र यासंदर्भात कोणतीही चौकशी केली जाऊ नये असं छाबुच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात एफआयआरही दाखल केलेली नाही.लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा  कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला. पेंटर म्हणून काम करणाऱ्या छाबुने घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी आपला मोबाईल अडीच हजार रुपयांना विकला. त्यामधून घरी अन्नधान्य घेऊन आला. मात्र नंतर घरात इतर कुटुंबीय नसताना घराचा दरवाजा आतून लावून घेत छाबुने गळफास लावून आत्महत्या केली छाबुची पत्नी पूनमने सांगितले की, मोबाईल विकून मिळालेल्या पैशामधून छाबुने घरातील लोकांसाठी अन्नधान्य आणि एक पंखा विकत घेतला. छाबु आई-वडील, चार मुले आणि पत्नीसहीत राहत होता. आमचा सर्वात लहान मुलगा पाच महिन्यांचा आहे.मागील दोन दिवसांपासून आम्ही काहीच अन्न खाल्ले नाहीय. लॉकडाऊननंतर आम्ही अन्नासाठी शेजाऱ्यांवरच विसंबून होतो असंही पूनमने पुढे सांगितलं. छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली. छाबुची आई आणि वडील मुलांना घेऊन घरासमोरच्या झाडाखाली बसले होते. घरात कोणीही नसल्याने संधीचा फायदा घेऊन छाबुने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणाMobileमोबाइल