शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Delhi Voilence : दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दंगेखोरांची पोलिसांनी केली धरपकड सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 8:59 PM

Delhi Voilence : आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आता बरीच पोलीस पथकं दिल्ली परिसरात छापेमारी करत आहेत.

ठळक मुद्दे सर्वप्रथम आम्ही नगरसेवकाचा शोध घेत आहोत जो प्रकाशझोतात आल्यानंतर गायब झाला आहे.आयबी स्टाफ अंकित शर्मा हत्येप्रकरणी संशयित नगरसेवकच्या शोधात पोलीस पथके तैनात आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी अचानक अनेक विशेष पथके तयार करून कारवाई करण्यास सुरवात केली. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आता बरीच पोलीस पथकं दिल्ली परिसरात छापेमारी करत आहेत.दंगलखोरांना पकडण्यासाठी सिव्हिल पोलीस, स्पेशल सेल आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि जवानांना वेगवेगळ्या पथकात सामील केले गेले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, “हिंसाचारात सामील असलेल्या सर्व पाहिजेत व्यक्तींच्या शोधात पथके वेगवेगळ्या संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत, तर सर्वप्रथम आम्ही नगरसेवकाचा शोध घेत आहोत जो प्रकाशझोतात आल्यानंतर गायब झाला आहे. उत्तर-पूर्व दिल्लीत तैनात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणाले की, "गुरू तेग बहादूर रुग्णालयात आमचे बरेच पोलीस कर्मचारी व्यस्त आहेत, तेथे अनेक जखमी दाखल आहेत. जखमींपैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही जखमींना शहरातील जय प्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मृत्यूनंतर आतापर्यंत जवळजवळ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या ३० हुन अधिक आहे."विशेष आयुक्त आणि डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसाच्या वेळेस परिसराची स्थिती बरीच सुधारली आहे. तेथे तणावपूर्ण शांतता आहे. कोणतीही अनुचित घटना देखील घडलेली नाही. त्यामुळे गुरुवारी अनेक दंगेखोरांचा पोलिसांची पथकं शोध घेत आहेत. हिंसाचारासाठी जबाबदार आणि फरार असलेल्यांच्या शोधात पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत."

सहआयुक्त आलोक कुमार म्हणाले की, "आम्ही मंगळवारी झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या आयबी सुरक्षा सहाय्यक अंकित शर्माच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहोत. आतापर्यंत अडीचशेहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यातील बरेच निष्पाप आढळले आणि त्यांना घरी पाठवले. १०० हून अधिक लोक अद्याप कोठडीत आहेत. त्यांनी दंगेखोरांविषयी बरीच माहिती दिली आहे. "मंगळवारी हिंसाचारग्रस्त भजनपुरा आणि झाफराबाद येथे तैनात असलेल्या डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "आयबी स्टाफ अंकित शर्मा हत्येप्रकरणी संशयित नगरसेवकच्या शोधात पोलीस पथके तैनात आहेत." अंकित शर्माचे वडील रवींद्रकुमार शर्मा यांनीही फरार नगरसेवकाचे नाव आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी घेतले आहे.

पीडितांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात शांतता राखण्यात व्यस्त असले तरी वास्तविकता अशी आहे की उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी आधीच आपले कर्तव्य बजावले असते तर गुरुवारी दुपारपर्यंत हिंसाचारात ३४ लोक मारले गेले नसते. दिल्लीचे वातावरण शांत आणि आनंदी असले असते. 

Delhi Voilence : दिल्लीत केजरीवालांची 'फरिश्ते' योजना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, जखमींना मोफत उपचार

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू