शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आळंदीतील महाराजाकडून सोशल मीडियावर बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 20:44 IST

आळंदीतील महाराजाने त्याच्या फेसबुकवरून बदनामीकारक पोस्ट केली होती.

ठळक मुद्देसंबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी; निवेदन जारी

आळंदी (शेलपिंपळ्गाव) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोशल मीडियाद्वारे खालच्या स्तरावर भाषा वापरून बदनामी केल्याबाबत आळंदीतील संग्राम भंडारे या महाराजावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आळंदीतील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आळंदी पोलिसांकडे केली आहे. जर, संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास याविरोधात आळंदी बंदचे आवाहनही करण्यात आल्याचे पत्र सोबत देण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित महाराज आळंदीतून परागंदा झाले आहेत.       याबाबत सोमवारी (दि.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे , महिला अध्यक्षा पुष्पा कुऱ्हाडे , संदिप नाईकरे, योगेश सातपुते यांनी आळंदी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांना निवेदन दिले. आळंदीतील संग्राम भंडारे याने नुकतेच त्याच्या फेसबुकवरून बदनामीकारक पोस्ट केली होती. त्याला शोधण्यासाठी कार्यकर्ते आळंदीतील घरी गेले असता तो बाहेर गेल्याचे तेथील वॉचमनने सांगितले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठांना कारवाईबाबतचे निवेदन दिले.        याबाबत आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, संबंधित महाराज नाशिकला गेला आहे. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर सोशल मीडियावरून त्याने ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र, दोन दिवसांनी तो आळंदीत आल्यावर त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. 

 

टॅग्स :AlandiआळंदीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक