शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

क्रूरतेचा कळस! महिलेने साफसफाई करणं न थांबवल्याने केली बेदम मारहाण अन् छाटली जीभ

By पूनम अपराज | Updated: October 17, 2020 21:03 IST

Crime News : याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे.

ठळक मुद्दे गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशापूर सरैया गावातील सुनिता वर्मा आपल्या घरासमोर धान्य ठेवण्यासाठी जागेची साफसफाई करत होती.

क्षुल्लक कारणावरून झालेला वाद पेटला. तो वाद मारहाण आणि अगदी जीव घेण्यापर्यंत पोहोचला. क्रूरतेचा कळस म्हणजे या वादात महिलेची जीभच छाटण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना अयोध्येतील आशापूर सरैया गावात घडली आहे. सार्वजनिक जागेच्या साफसफाईवरून वाद झाला. या वादावरून एका महिलेला बेदम मारहाण करत तिची जीभ कापली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे.गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशापूर सरैया गावातील सुनिता वर्मा आपल्या घरासमोर धान्य ठेवण्यासाठी जागेची साफसफाई करत होती. त्यावेळी गावातीलच अर्जुन नावाच्या व्यक्तीने तिला साफसफाई करण्यास मनाई केली. मात्र, सुनिताने न जुमानता काम सुरूच ठेवलं. त्यामुळे त्याने आणि त्याच्या कुटुंबाने सुनिताला मारहाण केली. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही तर तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.तिच्या गळ्यावर पाय ठेवल्यानंतर सुनिताची जीभ बाहेर आली. त्यावेळी तिची जीभ त्यांनी कापून टाकली.जीभ छाटल्याने तडफडणारी सुनिता ओरडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक धावत आले आणि त्यांनी सुनिताचा जीव वाचवला. गोसाईगंजमधील आरोग्य केंद्रात तिच्यावर  प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पीडितेचा पती रामप्यारे वर्माने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पत्नीला मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने अर्जुन आणि चंद्रकात नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिलेली आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस पुढील तपास करत आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकAyodhyaअयोध्याWomenमहिला