शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

भयावह! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहून स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लीटर पेट्रोल ओतून घेतलं जाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:21 IST

Crime News : अरुंधती हा एक हॉरर चित्रपट आहे. तरुणाने हा चित्रपट तब्बल 15 वेळा पाहिला आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. अरुंधती हा चित्रपट पाहून एका 23 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. कर्नाटकातील टुमकारू जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एक तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगू हॉरर चित्रपट आहे. तरुणाने हा चित्रपट तब्बल 15 वेळा पाहिला आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला. चित्रपटाच्या नादात त्याने अकरावीनंतरचे शिक्षणही सोडले. 

रेणुका प्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी त्याच्या वर्गात पहिला क्रमांक पटकवायचा. त्याला या चित्रपटाचे इतके व्यसन लागले की त्याने आपले शिक्षणही सोडले. घरच्यांनी त्याला चित्रपट पाहण्यास मनाई देखील केली. पण, त्याने ऐकलं नाही. हा तरुण त्याच्या कुटुंबीयांशी चित्रपटाची कॉपी करण्याबाबत बोलायचा. मात्र, घरच्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तरुणाने चित्रपटातील एक दृश्य कॉपी करण्याचा प्रयत्न केला. 

चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच रेणुका प्रसादने बुधवारी गावाच्या बाहेरील भागात सुमारे 20 लीटर पेट्रोल अंगावर ओतलं आणि स्वत:ला पेटवून घेतलं. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्याला जळत असलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो जवळपास ६० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोडिगेनहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. रेणुका प्रसाद याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रेणुका प्रसादच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने चांगला अभ्यास करावा आणि चांगले करिअर करावे अशी त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला. तेलुगू सुपरहिट चित्रपट 'अरुंधती'मध्ये अभिनेत्री स्वतःच्या इच्छेनुसार मरते आणि शत्रूचा बदला घेण्यासाठी तिचा पुनर्जन्म होतो. या चित्रपटापासून प्रेरित होऊन रेणुका प्रसाद याने त्याच्या इच्छेनुसार स्वत:ला जाळले, कारण त्यालाही पुनर्जन्म घ्यायचा होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेय  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी