शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

...अन् 'त्याने' 20 वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला; पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:02 IST

Crime News : तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात य़ेत आहे. पोलिसांच्या टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने तब्बल 20 वर्षांनंतर आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. पोलीस तपासात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील अहरोडा गावात 15 जुलै रोजी मांगेराम नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच आरोपींनी मृतदेह हा पेट्रोल टाकून जाळून दिला होता. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांना या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गोविंदा याला सोमवारी अटक करण्यात यश आलं. त्याच्याकडून काडतूसं जमा करण्यात आली आहेत. तसेच तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात य़ेत आहे. पोलिसांच्या टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने मोठा खुलासा केला आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या 27 वर्षीय गोविंदाने 20 वर्षांनंतर आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. 

गोविंदाचे वडील अजयपाल यांची 20 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. पोलीस अधिकारी अतुल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाने चौकशीदरम्यान पोलिसांना 20 वर्षांपूर्वी वडील अजयपाल यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मांगेरामला शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. याचाच बदला घेण्यासाठी गोविंदाने आपल्या काही साथीदारांसोबत हत्येचा कट रचला आणि मांगेरामची हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता गोविंदाला अटक केली असून ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, मारलं; गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न, तरुणीच्या 'त्या' Video ने खळबळ 

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला विष पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, बेदम मारलं आणि गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न केला असं  तरुणीने म्हटलं आहे. मृत्यूपूर्वी तिने केलेल्या Video मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात ही भयंकर घटना आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस