शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:10 IST

Crime News : सोशल मीडियावर कमेंट केल्या प्रकरणामुळे एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील इलायचीपूर गावातील जंगलात एका मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी आरोपीला पकडले आहे. या प्रकरणी त्याच्याच तीन मित्रांना अटक केली. इंस्टाग्रामवर विनोदी कमेंट्स करण्यावरून झालेल्या वादानंतर झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपीने किशोरला चाकू आणि खंजीराने २७ वेळा भोसकून ठार मारले होते.

फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपीने किशोराला त्याच्या घरातून आणले होते. त्याला मारण्यापूर्वी छोले-भटुरेही खायला दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील खजुरी येथील श्रीराम कॉलनीत राहणारा १७ वर्षीय किशोर रेहानचा मृतदेह मंगळवारी रात्री इलायचीपूरच्या जंगलात आढळला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू तीव्र धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. रेहानच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी त्याचा मित्र वसीम, श्रीराम कॉलनी खजुरी दिल्लीचा रहिवासी साहिल उर्फ टली आणि कासिम विहार फेज २, इलायचीपूर येथील रहिवासी रेहान उर्फ पंडित यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...

बुधवारी रात्री पोलिस पथकाने कासिम विहार कॉलनीतून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे चौघेही खूप जुने मित्र होते. रिहानसह सर्वजण सोशल मीडियावर होते. रिहान वसीम आणि एका मुलीच्या इन्स्टाग्रामवर कमेंट करत असे. काही कमेंट्समुळे वसीम चिडला होता. यावरून रिहान आणि वसीममध्ये भांडणही झाले.

वसीमने बदला घेण्यासाठी कट रचला. रेहानला याबाबत संशयही येऊ दिला नाही.  मंगळवारी तो त्याच्या दोन मित्रांसह रेहानच्या घरी गेला आणि त्याला इलायचीपूरला आणून त्याची हत्या केली.

साहिलने रेहानला मागून पकडले आणि वसीमने त्याच्यावर चाकूने वार केले. रेहानने त्याच्यावर ब्लेडने वार केले. यामुळे तो जमिनीवर बेशुद्ध पडला. यादरम्यान, त्याच्या दिशेने येणारी एक कार पाहून, गुन्ह्याच्या ठिकाणी साहिलच्या हातातून चाकू पडला. घटनास्थळावरून पळून जाताना वसीमने काही अंतरावर जाऊन झाडाजवळ चाकू लपवला. पोलिसांनी चाकू आणि ब्लेड जप्त केले आहेत.

आरोपींनी आधी खायला दिले

कासिम विहारमध्ये राहणारा रेहान उर्फ पंडित हा देखील पूर्वी श्रीराम कॉलनीत राहत होता. त्याचे कुटुंब काही काळापूर्वी कासिम विहारमध्ये स्थलांतरित झाले. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, त्यांनी इलायचीपूरमध्येच हत्या करण्यासाठी कट रचला होता. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी किशोरला त्याच्या घरी बोलावले. फिरायला जायचे सांगून वाटेत त्यांनी त्याला छोले-भटुरेही खायला दिले. फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्यांनी किशोरला घटनास्थळी नेऊन खून केला. रेहान एसी-मेकॅनिकचे काम शिकत होता, तर त्याचे वडील दुबईमध्ये काम करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम