शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:10 IST

Crime News : सोशल मीडियावर कमेंट केल्या प्रकरणामुळे एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील इलायचीपूर गावातील जंगलात एका मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी आरोपीला पकडले आहे. या प्रकरणी त्याच्याच तीन मित्रांना अटक केली. इंस्टाग्रामवर विनोदी कमेंट्स करण्यावरून झालेल्या वादानंतर झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपीने किशोरला चाकू आणि खंजीराने २७ वेळा भोसकून ठार मारले होते.

फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपीने किशोराला त्याच्या घरातून आणले होते. त्याला मारण्यापूर्वी छोले-भटुरेही खायला दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील खजुरी येथील श्रीराम कॉलनीत राहणारा १७ वर्षीय किशोर रेहानचा मृतदेह मंगळवारी रात्री इलायचीपूरच्या जंगलात आढळला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू तीव्र धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. रेहानच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी त्याचा मित्र वसीम, श्रीराम कॉलनी खजुरी दिल्लीचा रहिवासी साहिल उर्फ टली आणि कासिम विहार फेज २, इलायचीपूर येथील रहिवासी रेहान उर्फ पंडित यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...

बुधवारी रात्री पोलिस पथकाने कासिम विहार कॉलनीतून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे चौघेही खूप जुने मित्र होते. रिहानसह सर्वजण सोशल मीडियावर होते. रिहान वसीम आणि एका मुलीच्या इन्स्टाग्रामवर कमेंट करत असे. काही कमेंट्समुळे वसीम चिडला होता. यावरून रिहान आणि वसीममध्ये भांडणही झाले.

वसीमने बदला घेण्यासाठी कट रचला. रेहानला याबाबत संशयही येऊ दिला नाही.  मंगळवारी तो त्याच्या दोन मित्रांसह रेहानच्या घरी गेला आणि त्याला इलायचीपूरला आणून त्याची हत्या केली.

साहिलने रेहानला मागून पकडले आणि वसीमने त्याच्यावर चाकूने वार केले. रेहानने त्याच्यावर ब्लेडने वार केले. यामुळे तो जमिनीवर बेशुद्ध पडला. यादरम्यान, त्याच्या दिशेने येणारी एक कार पाहून, गुन्ह्याच्या ठिकाणी साहिलच्या हातातून चाकू पडला. घटनास्थळावरून पळून जाताना वसीमने काही अंतरावर जाऊन झाडाजवळ चाकू लपवला. पोलिसांनी चाकू आणि ब्लेड जप्त केले आहेत.

आरोपींनी आधी खायला दिले

कासिम विहारमध्ये राहणारा रेहान उर्फ पंडित हा देखील पूर्वी श्रीराम कॉलनीत राहत होता. त्याचे कुटुंब काही काळापूर्वी कासिम विहारमध्ये स्थलांतरित झाले. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, त्यांनी इलायचीपूरमध्येच हत्या करण्यासाठी कट रचला होता. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी किशोरला त्याच्या घरी बोलावले. फिरायला जायचे सांगून वाटेत त्यांनी त्याला छोले-भटुरेही खायला दिले. फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्यांनी किशोरला घटनास्थळी नेऊन खून केला. रेहान एसी-मेकॅनिकचे काम शिकत होता, तर त्याचे वडील दुबईमध्ये काम करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम