शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:06 IST

Crime News : तीन लाख रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर आठवड्याभरातच नववधू पैसे आणि दागिने घेऊन फरार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तीन लाख रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली आहे. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस लुटारू वधू आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह दलालांविरुद्ध फसवणूक आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाणे हद्दीतील रेवती रेंजमधील रहिवासी विजया पडना यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा राहुलची ओळख काजल उर्फ ​​ज्योती आणि राधेश्याम यांच्याशी झाली होती. हे लोक दलालांच्या मदतीने लग्न लावायचे. या टोळीने आपल्या मुलाला जाळ्यात अडकवलं. यानंतर पोलिसांनी विजया पडना यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

राहुल आणि ललिता यांचे लग्न 10 जुलैला झाले होते. ललिता ही विधवा आहे, असे सांगून तिचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाआधी छत्तीसगडच्या भिलाईमध्ये लग्नाआधी साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने मासिक पाळीचे कारण देऊन शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, यानंतर फक्त सात दिवसातच ती तरुणी फरार झाली. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने दलालाकडे धाव घेतली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छत्तीसगड येथेही एक टीम पाठवली आहे. ही एक मोठी टोळी असून त्यात अनेक लोक सामील असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी