शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus : ... 'त्या' पोलीस बाबाने सोडले प्राण, मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:49 IST

Coronavirus : मुलाने आशेने रात्री ९ च्या सुमारास केईएम रुग्णालय गाठले.

ठळक मुद्देमात्र सोमवारी उपचारादरम्यान या शिपायाची मृत्यूशी झुंज अखेर संपली.अखेर भोईवाड़ा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद कांबळेना कॉल करून याबाबत कारवाइ करण्यास सांगितले.

मनीषा म्हात्रे

मुंबई : अचानक पोलीस बाबाची तब्येत बिघडली. अंग तापाने फणफणु लागले आणि सुरु झाली पोलीस बाबाना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची धडपड. कोरोना संशयित असलेल्या या पोलिसाला राजावाड़ी ते कस्तुरबा.. कस्तुरबा ते नायर.. नायर ते केईएम करत अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे केईएम रुग्णालयात  उपचार मिळाले खरे, मात्र सोमवारी उपचारादरम्यान या शिपायाची मृत्यूशी झुंज अखेर संपली.       

 कुर्ला वाहतूक विभागात संबंधित पोलीस हवालदार कार्यरत आहेत. २० तारखेला घरात असताना ताप वाढल्याने त्यांनी खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. मंगळवारीही ताप कमी न झाल्याने मुलाने त्यांना दुपारच्या सुमारास राजावाड़ी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटल येथे जाण्यास सांगताच मुलाने कस्तुरबा रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नायर रुग्णालयाचा मार्ग दाखवला. मुुलाने विनंती करूनही त्यांना दाखल करून घेतले नाही. अखेर मुलाने नायर रुग्णालयाकडे धाव घेतली. नायर रुग्णालयानेही तेच कारण देत केईएमकड़े जाण्यास सांगितले.        

मुलाने आशेने रात्री ९ च्या सुमारास केईएम रुग्णालय गाठले. मात्र तेथील डॉक्टरांनीही नकार देत कस्तुरबाचा रस्ता दाखवला. याबाबत मुलाने कुर्ला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रणदिवेकड़े व्यथा मांडली. ते देखील नियंत्रण कक्षाद्वारे याबाबत मदत मागत होते. अखेर भोईवाड़ा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद कांबळेना कॉल करून याबाबत कारवाइ करण्यास सांगितले. कांबळेनी हस्तक्षेप करत रुग्णालयातील अधिकारीना त्यांना दाखल करून घेण्यास सांगितले. आणि तब्बल तासाभराने १० च्या सुमारास त्यांच्यावर उपचार सुरु झाले. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने त्यांच्या मुलासह त्यांच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत मुंबईपोलिसांनी ट्वी द्वारे माहिती दिली.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूtraffic policeवाहतूक पोलीस