शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 21:06 IST

सायबर, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध पाहिजे

ठळक मुद्देमावळते आयुक्त संजय बर्वे यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न पुढे अधिक गतीने राबविण्याची गरज आहे.परमबीर सिंग यांना सेवानिवृतीपर्यंत तब्बल २ वर्षे ४ महिन्याचा कालावधी मिळणार आहे.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरात सर्व प्रकारचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ठोस उपाय योजना राबविण्याची आवश्यकता भासणार आहे. त्याचबरोबर वर्दीचा गैरफायदा घेत खात्याची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढत असल्याने त्याला लगाम घालण्यासाठी महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. मावळते आयुक्तसंजय बर्वे यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न पुढे अधिक गतीने राबविण्याची गरज आहे.

परमबीर सिंग यांना सेवानिवृतीपर्यंत तब्बल २ वर्षे ४ महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना खात्याच्या सुधारणेसाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्याची पुरेपर संधी मिळणार आहे. मुंबईत काम करण्याचा अनुभव असल्याने ते त्यामध्ये यशस्वी होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

जानेवारीमध्ये गँगस्टर इजाज लकडावाला, त्याचे हस्तक परवीन तारीक आणि सलीम महाराज यांना गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्या जबाबातून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.गॅंगस्टर काही पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनेच गंभीर गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. काही आयपीएस अधिकाऱ्यांपर्यत त्यांची लिंक असल्याचे सांगितले जात असून खात्याच्या प्रतिमेसाठी ही बाब मारक आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी या प्रकरणाच्या मूळापर्यंत जावून शोध घेतला पाहिजे. मुंबईतील अंडरवर्ल्डची पाळेमुळे त्यांना माहित असल्याने या प्रकरणाचा छडा लावतील, अशी आशा व्यक्त केली जात आहेत.

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेcommissionerआयुक्तMumbaiमुंबईPoliceपोलिस