शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाऊ २ वर्ष कैदेत; आता कोर्टासमोर खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 5:01 PM

२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला

ठळक मुद्देपीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलंअल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती.ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला

मुंबई – शहरातील कोर्टाने एका व्यक्तीला अल्पवयीन बहिणीचा बलात्कार केल्याचा आरोपाखाली दोषी ठरवत त्याला २ वर्षाची शिक्षा सुनावली. आरोपी भाऊ २ वर्ष जेलमध्ये बंद होता. परंतु आता त्याच्या बहिणीनं कोर्टासमोर सत्य आणल्यानं मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. खोटं बोलून भावाची फसवणूक केल्याचं बहिणीनं कोर्टासमोर कबुल केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.

२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये पुन्हा संधी मिळताच त्याने तोच प्रकार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलं. पोलीस तपास, मुलीचा जबाब आणि दोन साक्षीदारांच्या हवाल्याने कोर्टात भावाला दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपी २ वर्ष कैदेत होता. त्यानंतर आता आरोपीची बहिण दिंडोशी कोर्टात पोहचली आणि तिने भावाने माझा बलात्कार केला नाही असं कबुल केले आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती. ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला. अनेकदा मारहाणही केली. त्यावरुन नाराज झालेल्या बहिणीनं भावाविरोधात तक्रार दाखल केली. आता या मुलीच्या कबुलीनाम्यावरुन कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवत त्याची सुटका केली आहे. याचबरोबर युवकाच्या बहिणीनं तक्रार दाखल करताना तिची मेडिकल चाचणी केली नव्हती असंही सांगितलं आहे.

आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २ वर्ष या युवकाचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. मनस्वी अस्थाना म्हणतात की, अशाप्रकारे खोट्या तक्रारी आणि घरगुती वादातून नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. हे भविष्यासाठी चांगले नाही. लोकांमधील भावनिक नातं संपत चाललं आहे. खोट्या तक्रारी देऊन बदला घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी तोडगा काढायला हवा असं त्यांचे म्हणणं आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालय