मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस पाठवणार समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 21:14 IST2021-10-14T21:13:07+5:302021-10-14T21:14:05+5:30
Sameer Wankhede : वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करत काही प्रश्न विचारल्याचं कळत आहे.

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस पाठवणार समन्स
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. मुंबईपोलिसांचा साधा वेशातील पोलीस पाळत ठेवत असल्याचा समीर वानखेडेंनी आरोप केला होता, त्यानंतर चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे. वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करत काही प्रश्न विचारल्याचं कळत आहे.
सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोन्ही कॉन्स्टेबल ओशिवाराच्या डिटेक्शन विभागाचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोन कर्मचाऱ्यांनाचे फोटो समोर आले आहे. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये दोन कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हे फोटो कुठले आहे हे त्यांच्या लक्षात नाही.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या आठवड्यात मुंबईच्या खोल समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)
एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली. महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली. ओशिवारा पोलिसांनी स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली.