शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोठी कारवाई! बॉम्बस्फोटातील फरार दहशतवाद्याला कानपूरमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 18:06 IST

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.

ठळक मुद्देतो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. ५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता.महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले. 

मुंबई - राजस्थानच्या अजमेर येथील बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरार दहशतवादी डॉ.मोहम्मद जलीस शफी उल्ला अन्सारीला (६८) महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून ताब्यात घेतले आहे. हा फरार आरोपी पॅरोलवर असताना फरार झाला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथीस मोमीन पाडाच्या बीआयटी चाळीत तो कुटुंबियांसोबत रहात होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.कुख्यात दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला कानपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब म्हणून देखील ओळखतात. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. त्यामुळे तो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. 

कोण आहे डॉ. जलील अन्सारी ?मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदीच्या शतकात पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये नैपुण्य मिळवले. १९९२ साली राजस्थानच्या अजमेर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. अजमेर ब्लास्टमधील त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोर्टाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरारनुकताच ६८ वर्षीय जलील २१ दिवसांचा पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात १०.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान हजेरी लावण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र, १६ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसBombsस्फोटकेBlastस्फोट