शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:06 IST

Bhima Koregaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. 

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली.

मुंबई -  भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण आनंद तेलतुंबडे यांनी मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केले, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी मुंबईतील कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात आनंद तेलतुंबडे पोचले असल्याचे सांगितले. 

Bhima Koregaon : गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम  दिलासा  

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि इतर अनेकजणांवर माओवाद्यांचा संबंध असल्याचा आणि सरकार उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) च्या कडक तरतुदीखाली गुन्हा दाखल करण्यात आला.अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिलं होतं. अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. नंतर ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय