शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अंधश्रद्धेतून दीड महिना सुरू होती मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 6:05 AM

कल्याणमधील मायलेकाचं मृत्यूप्रकरण : जीवदानी, दत्त अंगात आलेल्याकडून घडले हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कविता तरे (२७) हिच्या अंगात जीवदानीदेवी, विनायक तरे (२२) याच्या अंगात काळभैरव आणि एका अल्पवयीन मुलाच्या अंगात दत्त आल्यावर ते गेला दीड महिना पंढरीनाथ शिवराम तरे (५०) आणि चंदूबाई शिवराम तरे (७६) या मायलेकाच्या अंगातील भूत उतरवण्याकरिता त्यांना अंगावर हळद टाकून मारहाण करीत होते आणि आजूबाजूचे कुणीही त्यांना या मारहाणीतून वाचविण्याकरिता ना पोलिसांकडे गेले ना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे गेले. सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या शहरातील घोर अंधश्रद्धेतून घडलेल्या हत्याकांडाची ही लाजिरवाणी कहाणी आता उघड झाली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेले तिघे आरोपी अजून आपण काळभैरव, दत्त आणि जीवदानीदेवी असल्याचे समजत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजूनही हे तिघे जण आपण देवांचे अवतार असल्याच्या भ्रमात आहेत. आपण ज्यांना बेदम मारले, ते त्यांच्या शरीरातील भूत निघून गेल्याने निपचित पडले असून कधीही उठून उभे राहतील, अशी भाकडकथा चौकशीत पोलिसांना सांगत आहेत. अंगातील भूत तंत्रमंत्र करून बाहेर निघेल, या अंधश्रद्धेपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथील पश्चिमेकडील अटाळीत शनिवारी घडली. या घटनेने समाजातील संवेदनशील व्यक्ती व पोलीस यांना धक्का बसला.

या प्रकरणी पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक तरे, कविता तरे यांच्यासह मांत्रिक सुरेंद्र पाटील याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे हिच्या अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याने पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगीता ही कविताला अटाळी गावात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेऊन जात असत. मांत्रिक पाटील याने त्यांना पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदूबाई या दोघांच्या अंगात भूत आहे व त्यांच्या अंगातील भूत तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर, कविताच्या अंगात जीवदानीदेवी, विनायकच्या अंगात काळभैरव आणि घरातील एका अल्पवयीन मुलाच्या अंगात दत्त संचारले. या तिघांनी मायलेकाची हत्या केल्याने सध्या कोठडीची हवा खात आहेत. त्या तिघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.च्पोलिसांच्या चौकशीतही हे तिघे आपण देव असल्याचे ठामपणे सांगत असून पंढरीनाथ आणि चंदूबाई यांची हत्या झालेली नसून त्यांच्या अंगातील भूत मारहाणीमुळे पळून गेल्याचे ते सांगत आहेत. वरकरणी हे प्रकरण अंधश्रद्धेचे भासविले जात असले, तरी प्रत्यक्षात मालमत्तेच्या वादातून तर घडलेले नाही ना, असे पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, तरे यांच्या घरात एकत्र कुटुंबपद्धती असून आर्थिक परिस्थिती फार चांगली किंवा खूप हलाखीची नाही.च्एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दुहेरी हत्याकांड कोणत्या आर्थिक वादातून घडले ते आतापर्यंतच्या तपासातून उघड झालेले नाही. ज्यांच्या बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला, त्या तिघांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यामुळे हे तिघे इतके पराकोटीचे अंधश्रद्धाळू असण्याइतके अल्पशिक्षित नाहीत. आतापर्यंत अंधश्रद्धेच्या घडलेल्या घटनांमध्ये मांत्रिकाने स्वत:च्या आर्थिक लोभापायी भक्तांना आमिष दाखवून फसविल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात तसे काही दिसून येत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे.

टॅग्स :Policeपोलिस