शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

देशभरातील विमानतळांना बीसीएएसचा अतिदक्षतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 9:23 PM

सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हिजिटर पास बंद, सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश

ठळक मुद्दे १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेने नागरी हवाई वाहतूकीची सुरक्षा सांभाळणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस) ने मुंबईसह देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राला वाढलेल्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.१० ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत विमानतळावर आगंतुकांना प्रवेश दिला जावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक, जलद कृती दलांना सर्व विमानतळांवर कार्यरत करावे, निरीक्षण वाढवावे, विमानतळाकडे जाणाऱ्या नाक्यांवर वाहनांची व नागरिकांची तपासणी करावी, कार्गो टर्मिनलवरील सुरक्षेत वाढ करावी, सशस्त्र जवानांनी यावर लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारत, ऑपरेशनल विभाग यामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवावे, विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक तैनात ठेवावे, टर्मिनल इमारतीजवळ कोणतेही वाहन पार्क करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, पार्किंगमध्ये लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारतीत येणाऱ्या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवावे, विमानतळावर येणाऱ्या वाहनाची पूर्ण तपासणी करावी, चालकाचे ओळखपत्र तपासावे, हवाई रुग्णवाहिका (एअर अ‍ॅम्ब्युलन्ससहित) वेळापत्रकात नसलेल्या विमानांच्या उड्डाणांवर व आगमनावर लक्ष ठेवावे, विमानात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी, बॅगेज क्षेत्रावर देखील लक्ष ठेवावे, अशा विविध सूचना बीसीएएसच्या उप संचालक सी.के. रंगा यांनी दिल्या आहेत. विमानतळावरील सुरक्षेसोबत कोणतीही त्रुटी होणार नाही याची काळजी घ्यावी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी, बीसीएएसचे विभागीय संचालक यांनी परिस्थितीचा व्यक्तिश: आढावा घ्यावा व सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करावी असे निर्देश बीसीएएसच्या संचालकांकडून देण्यात आले आहेत. विमानतळांसोबत एअरिस्ट्रप, फ्लाईंग स्कूल, हवाई वाहतूक प्रशिक्षण केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :AirportविमानतळIndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिवस