शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Video - नवरदेवाशिवाय शेकडो मुलींचं लावलं लग्न, 15 जणांना अटक; नेमकं काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 11:31 IST

शेकडो मुलींनी नवरदेवाशिवाय स्वत:शीच लग्न केलं. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेतील फसवणुकीबाबत कारवाई करण्यात आली आहे. मणियार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात तीन सरकारी अधिकारी/कर्मचारी आणि इतर 12 लोकांची नावं समोर आली आहेत. सध्या तपास सुरू आहे. आता आणखी लोकांवर कारवाई होऊ शकते.

25 जानेवारी रोजी मणियार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 537 जोडप्यांचा विवाह पार पडला. मात्र यातील अनेक जोडपी खोटी निघाली. काहींची आधीच लग्न झालेली होती, तर काहींना पैसे देऊन आणलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो मुलींनी नवरदेवाशिवाय स्वत:शीच लग्न केलं. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक नववधू स्वत:ला हार घालताना दिसत आहेत. 

सामूहिक विवाह योजनेत अशाप्रकारे अपात्र जोडप्यांची नावे नोंदवून सरकारी पैसे वाटण्यात आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बलिया जिल्हा प्रशासनावर बरीच टीका झाली. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर, बलिया डीएमच्या सूचनेनुसार, 30 जानेवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. समाजकल्याण विभागाचे दोन सहाय्यक विकास अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण विभागाच्या एका काउंटर ऑफिसरसह एकूण 15 आरोपींना अटक केली. आणखी दोन अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी 30 जानेवारी 2024 रोजी एक अधिकारी आणि इतर आठ लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. ही कारवाई पुढे करण्यात येत आहे. जो कोणी भ्रष्टाचार करतो, मग तो अधिकारी/कर्मचारी असो किंवा इतर कोणीही असो, त्याला सोडले जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सामूहिक विवाह योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर अशी कारवाई होईल की ते जिल्ह्यासाठी उदाहरण ठरेल. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी