शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विनयभंगाच्या आरोपातून जामिनावर सुटका; पत्नीसोबतच्या भांडणातून अधिकाऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 18:36 IST

कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (वय 38) यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मृत शर्मा हे ठाण्यातील कोलशेत परिसरातील लोढा- आमरा येथे राहत होते.हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले होते.

ठाणे - विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे आणि मारहाणीमुळे व्यथित झालेल्या रिलायन्स वाशी (नवी मुंबई) येथील कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (वय 38) यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत शर्मा हे ठाण्यातील कोलशेत परिसरातील लोढा- आमरा येथे राहत होते. विवाहित असलेल्या अभिशेषकुमारला एक सहा वर्षाचा मुलगा आहे. आपल्याच कार्यालयात सहकारी महिलेने त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्याला 28 नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले होते. सोमवारी 3 डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्याची सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जामिनावर सुटका केली. विनयभंगाच्या प्रकरणात त्याला अटक झाली. 28 नोव्हेंबर रोजी शर्माची पत्नी पोर्णिमा (वय 30) हिला त्याचे हे प्रकरण समजले. सोमवारी सायंकाळी तो जामिनावर सुटल्यानंतर मात्र, तिने या प्रकरणी जाब विचारुन त्याला फैलावर घेतले. त्याच्या आई वडीलांसमोरच तिने चांगलाच पानउतारा करत त्याच्याशी कडाक्याचे भांडण केले. तिचा संयम सुटल्यानंतर तिने यातूनच त्याला मारहाणही केली. आधी पूर्वीच्या मैत्रिणीने केलेल्या विनयभंगाच्या गुन्हयात झालेली अटक आणि त्यानंतर पत्नीने आई वडीलांसमोरच जाब विचारत केलेले कडाक्याचे भांडण यातून व्यथित होऊन आपल्याच लोढा- आमरा या इमारतीच्या 25 व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यूPoliceपोलिसRelianceरिलायन्स