शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Badaun Gangrape Case : "पीडिता संध्याकाळी एकटीच घराबाहेर गेली नसती तर अशी घटना घडलीच नसती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 13:40 IST

Badaun Gangrape Case : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महिलेने कोणाच्याही प्रभावाखाली एकटं बाहेर पडायला नको होतं. पीडित महिला संध्याकाळी एकटीच बाहेर गेली नसती तर अशी घटना घडली नसती असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे. 

चंद्रमुखी देवी यांच्या या वादग्रस्त विधानवरून अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जोरदार टीका केली आहे. मात्र टीकेचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतले आहे. तसेच विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रमुखी यांनी महिलांनी कोणत्याही वेळी घराबाहेर पडू नये. पीडिता संध्याकाळच्या वेळी एकटी बाहेर गेली नसती तर ही घटना घडली नसती असं म्हटलं. 

महिलेला फोन करून बोलावण्यात आलं होतं. यामुळे हे प्रकरण सुनियोजित होतं. फोन आल्यावर पीडित महिला तिथे गेली आणि अशी परिस्थिती उद्भवली असं देखील चंद्रमुखी देवी म्हणाल्या. मात्र त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. बदायूं सामूहिक बलात्कार प्रकरणी विविध वृत्तवाहिन्यांमधून आपलं विधान दाखवण्यात येत आहे. महिलांनी संध्याकाळी घराबाहेर पडू नये असं दाखवलं जात आहे. मात्र आपण या संदर्भात काहीही बोललो नाही. आपल्या विधानाचा कुठूनही अर्थ निघत असेल तर ते मी मागे घेते आणि पीडित कुटुंब आणि महिलांची माफी मागते, असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे. 

बदायूं बलात्कार प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्या 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षे वयाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात व पायांना जखमा झाल्याचे व मारहाणीत बरगड्या मोडल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. ही महिला देवळात दर्शनाला गेली होती. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. या गुन्ह्यातील आरोपी असलेला पुजारी सध्या फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.

महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष - प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सांगितले की, उत्तरप्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्या राज्यातील प्रशासनाचा दृष्टिकोन चांगला नाही. हाथरसच्या बलात्कार प्रकरणात राज्य सरकारच्या प्रशासनाने पीडितेच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केले. बदायूंत जिथे बलात्कार झाला त्या ठिकाणाची पोलिसांनी तपासणीही केली नाही.

"मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात"

देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. "बहुतांश मुली या आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात" असं विधान महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं होतं. "जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. मात्र जेव्हा त्यांचे असे हे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात" असं नायक यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी