शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

देशात दर दिवशी सरासरी 91 बलात्कार; धक्कादायक आकडेवारी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:42 IST

भारतात दरदिवसाला 81 खून, 289 अपहरण, 91 बलात्काराचे सरासरी गुन्हे घडले आहेत. 

ठळक मुद्दे सन 2018 मध्ये 50,74,634  दखलपात्र गुन्हे घडले आहेत. तर 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये  1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015 च्या तुलनेत 2017 साली नोंद झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांची नोंद देखील कमी आहे .अपहरणाचे गुन्ह्यात 2018 साली 10.3 टक्क्यांनी वाढ झाली

नवी दिल्ली - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) गुरुवारी देशभरातील गुन्हेगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार सन 2018 मध्ये 50,74,634  दखलपात्र गुन्हे घडले आहेत. तर 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये  1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2017 मध्ये दखलपात्र गुन्ह्यांची संख्या 50,07,044 होती. 2017 साली गुन्हेगारीचे प्रमाण प्रति लाख लोकसंख्येला 388.6 होते. तर  2018 मध्ये कमी होऊन  383.5 झाले आहे. 2018 सालच्या क्राईम रेकॉर्डनुसार भारतात दरदिवसाला 81 खून, 289 अपहरण, 91 बलात्काराचे सरासरी गुन्हे घडले आहेत. 

यापूर्वी एनसीआरबीने अलीकडेच 2017 साली घडलेल्या गुन्हेगारीचा अहवाल जाहीर केला होता. त्यानुसार सन 1992 नंतर हत्येचे प्रमाण हळूहळू कमी झाले. सन 1963 नंतर 2017 मध्ये कमी प्रमाण नोंदविण्यात आले. त्यानुसार, एक लाख लोकसंख्येला 2.49 खून नोंदविण्यात आले. 2015 च्या तुलनेत 2017 मध्ये चोरीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. तसेच 2015 च्या तुलनेत 2017 साली नोंद झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांची नोंद देखील कमी आहे.

 

अपहरणाचे गुन्ह्यात 2018 साली 10.3 टक्क्यांनी वाढ झाली असून 105734एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 63356 (15250 मुलं आणि 48106 मुली) लहान मुलं तर 42180 एफआयआर (9415 पुरुष, 32765 महिला) हे 18 वर्षावरील सज्ञान व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी नोंद आहेत. महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या देखील 2018 साली वाढली असून ती संख्या 378277  इतकी आहे. त्यापैकी 2018 भा. दं. वि. कलम 376 अन्वये नोंद झालेले बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रमाण 33356 इतके आहे. 2017 साली ती संख्या 359849  इतकी होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारMurderखूनKidnappingअपहरणIndiaभारत