शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:34 IST

Crime News : काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि गावकऱ्यांनी त्यांना पळून जाताना पकडलं.

नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कुठे, कसं आणि कधी होईल हे सांगता येत नाही. प्रेम प्रकरणांची काही हटके उदाहरणं ही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना झारखंडमध्ये घडली आहे. आपल्या तीन लेकरांना सोडून काकी भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. काकीने पकडले गेल्यावर पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र कुटुंब आणि गावकरी यांच्या भीतीने भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या काकीने त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या बाजीतपूर गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. 25 वर्षीय मुलगा त्याच्या 35 वर्षीय काकीच्या प्रेमात पडला. त्यानंतर गेले कित्येक दिवस या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. महिलेला तीन लहान मुलं आहेत. एक आठवड्यापूर्वी हे दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करून आपल्या भाच्याविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना या दोघांचा शोध लागला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना दोघांची माहिती मिळाली. 

काकी आणि तिचा भाचा हे दोघेही जमालपूरमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना शोधून काढलं आणि समजावून घरी परत आणलं. घरी परत आल्यानंतर महिला पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली. तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या भीतीमुळे भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच काकीसोबत कोणतेही संबंध नसल्याचं म्हटलं. हे ऐकल्यावर काकी संतप्त झाली. तिने भाच्यावरच फसवणुकीचा आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यानेच आपल्याला पळून नेलं असं देखील म्हटलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील पंजाबी कॉलनीत ही भयंकर घटना घडली आहे. साधारण एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर गेले कित्येक दिवस महिला नैराश्यात होती. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वत: ला जाळून घेतलं आणि घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJharkhandझारखंड