शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:34 IST

Crime News : काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि गावकऱ्यांनी त्यांना पळून जाताना पकडलं.

नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कुठे, कसं आणि कधी होईल हे सांगता येत नाही. प्रेम प्रकरणांची काही हटके उदाहरणं ही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना झारखंडमध्ये घडली आहे. आपल्या तीन लेकरांना सोडून काकी भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. काकीने पकडले गेल्यावर पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र कुटुंब आणि गावकरी यांच्या भीतीने भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या काकीने त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या बाजीतपूर गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. 25 वर्षीय मुलगा त्याच्या 35 वर्षीय काकीच्या प्रेमात पडला. त्यानंतर गेले कित्येक दिवस या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. महिलेला तीन लहान मुलं आहेत. एक आठवड्यापूर्वी हे दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करून आपल्या भाच्याविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना या दोघांचा शोध लागला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना दोघांची माहिती मिळाली. 

काकी आणि तिचा भाचा हे दोघेही जमालपूरमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना शोधून काढलं आणि समजावून घरी परत आणलं. घरी परत आल्यानंतर महिला पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली. तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या भीतीमुळे भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच काकीसोबत कोणतेही संबंध नसल्याचं म्हटलं. हे ऐकल्यावर काकी संतप्त झाली. तिने भाच्यावरच फसवणुकीचा आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यानेच आपल्याला पळून नेलं असं देखील म्हटलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील पंजाबी कॉलनीत ही भयंकर घटना घडली आहे. साधारण एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर गेले कित्येक दिवस महिला नैराश्यात होती. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वत: ला जाळून घेतलं आणि घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJharkhandझारखंड