शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:34 IST

Crime News : काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि गावकऱ्यांनी त्यांना पळून जाताना पकडलं.

नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कुठे, कसं आणि कधी होईल हे सांगता येत नाही. प्रेम प्रकरणांची काही हटके उदाहरणं ही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना झारखंडमध्ये घडली आहे. आपल्या तीन लेकरांना सोडून काकी भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. काकीने पकडले गेल्यावर पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र कुटुंब आणि गावकरी यांच्या भीतीने भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या काकीने त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या बाजीतपूर गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. 25 वर्षीय मुलगा त्याच्या 35 वर्षीय काकीच्या प्रेमात पडला. त्यानंतर गेले कित्येक दिवस या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. महिलेला तीन लहान मुलं आहेत. एक आठवड्यापूर्वी हे दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करून आपल्या भाच्याविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना या दोघांचा शोध लागला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना दोघांची माहिती मिळाली. 

काकी आणि तिचा भाचा हे दोघेही जमालपूरमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना शोधून काढलं आणि समजावून घरी परत आणलं. घरी परत आल्यानंतर महिला पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली. तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या भीतीमुळे भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच काकीसोबत कोणतेही संबंध नसल्याचं म्हटलं. हे ऐकल्यावर काकी संतप्त झाली. तिने भाच्यावरच फसवणुकीचा आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यानेच आपल्याला पळून नेलं असं देखील म्हटलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील पंजाबी कॉलनीत ही भयंकर घटना घडली आहे. साधारण एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर गेले कित्येक दिवस महिला नैराश्यात होती. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वत: ला जाळून घेतलं आणि घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJharkhandझारखंड