शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अबब! ५ वर्षांत रेल्वे अपघातात 18,423 जणांचा मृत्यू तर 18,874 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 19:04 IST

दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे. 

मुंबई - अमृतसरमध्ये रावण दहन रेल्वे पटरीवर उभे राहून पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. या भीषण अपघात 61 लोकांच्या मृत्यू झाला तर  70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मुंबईची लाइफ लाइन असलेल्या रेल्वे लोकलमधून दररोज एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये बरीच गर्दी पाहायला मिळते. धावपळीच्या जगात या गर्दीमुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजावर लटकून तर कधी उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना किती लोकांच्या मृत्यू आणि  जखमी झाले आहे याची  माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलिसांचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती पुरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उपनगरी रेल्वे पटरीवर रेल्वे लोकलमधून पडून  किंवा पटरी क्रॉस करताना 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत एकूण 18423 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच 18847 लोक जखमी झाले आहेत. 

वर्षानुसार किती मृत्यू आणि लोक जखमी :-

2013 - एकूण 3506 लोकांच्या मृत्यू 3318 जखमी 

2014 - एकूण 3423 लोकांच्या मृत्यू 3299 जखमी 

2015 - एकूण 3304 लोकांच्या मृत्यू 3349 जखमी 

2016 - एकूण 3202 लोकांच्या मृत्यू 3363 जखमी 

2017 मध्ये एकूण 3014 लोकांच्या मृत्यू 3345 जखमी 

2018 ऑगस्टपर्यंत एकूण 1974 लोकांच्या मृत्यू 2173 जखमी

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजू सुरक्षा भिंत बांधण्याच्या आदेश दिले आहे. परंतु रेल्वे प्रशासने याकडे लक्ष दिलेले नाही. अमृतसरसारख्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहात का असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांना विचारला आहे.   

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातcentral railwayमध्य रेल्वे