शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

"आठवडाभर आंघोळ करायची नाही..."; अतुल-निकितामध्ये 'या' गोष्टीमुळे झालेलं पहिलं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:12 IST

अतुलने एक मोठा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष आणि त्याची पत्नी निकिता यांच्यात पहिलं भांडण हे नॉनव्हेजवरून झालं होतं. जुलै २०२४ मध्ये कौटुंबिक न्यायालयात नोंदवलेल्या जबाबात अतुलने सांगितलं होतं की, तो आणि त्याचं कुटुंब शाकाहारी आहे. निकिता ही मांसाहारी आहे. ती आठवडाभर आंघोळ करायची नाही. या मुद्द्यावरून अतुल आणि निकिता यांची भांडणं व्हायची. 

एकदा माझ्या आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निकिताने आईला ढकललं. तिच्यावर आणि माझ्यावर हल्ला करण्यात आला. लग्नापूर्वी निकिता दिल्लीत काम करायची. लग्नानंतर निकिताची बंगळुरूला बदली झाली. बंगळुरूला जाईपर्यंत दोघांमधील संबंध चांगले होते. पण, हळूहळू नॉनव्हेजवरून वाद वाढत गेला. निकिताची आई आणि भाऊ पैशांची मागणी करत होते. 

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आरोपी निकिताची आई निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया हे ढालगर येथील घर सोडून गेल्या ४८ तासांपासून फरार आहेत. या प्रकरणातील आरोपी निकिताचे काका सुशील सिंघानिया हेही घराबाहेर पडत नाहीत. बंगळुरू पोलीस गुरुवारी जौनपूरला पोहोचले आणि आरोपींना अटक केल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी अशी कोणतीही कारवाई केलेली नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने एक मोठा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. पत्नी निकिता सिंघानिया, सासू, मेहुणा आणि त्याच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले. अतुलच्या वडिलांनी सांगितलं की, एप्रिल २०१९ मध्ये मुलाचं लग्न झालं होतं. यानंतर सून मुलासह बिहारला आली आणि २ दिवसांनी निघून गेली. यानंतर तिने मुलाला हनिमूनसाठी मॉरिशसला जायचं असल्याचं सांगितलं. त्यावर मुलाने बाबा, मी जाऊ का? असं विचारलं. तेव्हा मी म्हणालो की, सुनेची इच्छा असेल तर जा. त्यानंतर दोघेही मॉरिशसला गेले. २०२० मध्ये नातवाचा जन्म झाला.

 "कोरोनात सासू घरी आली आणि माझा मुलगा उद्ध्वस्त झाला"; अतुलच्या वडिलांचा गंभीर आरोप

नातू लहान होता म्हणून मी माझ्या पत्नीला बंगळुरूला पाठवलं. २०२१ मध्ये जेव्हा देशभरात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होती, तेव्हाही मुलगा तिथे होता आणि त्याची आईही होती. मात्र, आईला मधुमेह असल्याने २०२१ मध्ये मुलाची काळजी घेण्यासाठी त्याने सासूला बोलावलं. निकिताची आई म्हणजेच अतुलची सासू बंगळुरूला येताच घरातील परिस्थिती आणखी बिघडू लागली आणि वाद सुरू झाला आणि मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी