शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

एकाच वेळी निघाली कुटुंबातील पाच जणांची अंत्ययात्रा, धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:33 IST

Suicide Case : गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.

समस्तीपूर : जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मऊ गावात एका कुटुंबातील घरमालक, त्याची आई, पत्नी आणि दोन निष्पाप मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्यानंतर त्या मृतदेहांचे समस्तीपूर सदर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तेथे वैद्यकीय मंडळाच्या डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करून रविवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातून बाहेर पडलेल्या पाच जणांची अंत्ययात्रा पाहताच गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

एकाच कुटुंबातील पाचही सदस्यांची अंत्ययात्रा एकत्र घरातून बाहेर पडले, तेव्हा सर्वांचेच हृदय हेलावून गेले, त्यामुळे नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. त्याचवेळी उपस्थित स्थनिकांचे डोळे पाणावले होते. कुटुंब प्रमुख असलेल्या मनोजच्या या निर्णयाबाबत सर्वजण आपापली बाजू मांडत होते. मनोज यांचे धाकटे जावई खुसरुपूर येथील रहिवासी आशिष मिश्रा यांनी पाचही मृतदेहांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित शेकडो लोकांचे डोळे पाणावले. सीओ अजय कुमार, एसएचओ प्रसंजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येने सावकारांची दहशत चव्हाट्यावर येत आहे. तीन लाखांच्या कर्जाच्या व्याजासह 18 लाखांची मागणी सावकाराने केली होती. यासाठी कुटुंबाला त्रास दिला जात होता. मृत मनोजची मोठी मुलगी काजल हिने पोलिसांना सांगितले की, माझ्या लग्नात आजोबांनी गावातील एका व्यक्तीकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. तो व्याज जोडून माझ्या आजोबा आणि वडिलांकडे १८ लाख रुपयांची मागणी करत होता. व्याज घेणारा रोज घरी येऊन शिवीगाळ करत असे. याला कंटाळून दादाने आधीच आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी एक कर्जदार वडिलांची ऑटो रिक्षा घेऊन गेला होता. त्यामुळे घरची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. वडिलांकडे दोन खोल्यांच्या झोपडीशिवाय काहीच नव्हते. घराजवळील एका छोट्या मोकळ्या जागेवरही लोकांनी कब्जा केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहारDeathमृत्यू