शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

एकाच वेळी निघाली कुटुंबातील पाच जणांची अंत्ययात्रा, धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:33 IST

Suicide Case : गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.

समस्तीपूर : जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मऊ गावात एका कुटुंबातील घरमालक, त्याची आई, पत्नी आणि दोन निष्पाप मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्यानंतर त्या मृतदेहांचे समस्तीपूर सदर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तेथे वैद्यकीय मंडळाच्या डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करून रविवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातून बाहेर पडलेल्या पाच जणांची अंत्ययात्रा पाहताच गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

एकाच कुटुंबातील पाचही सदस्यांची अंत्ययात्रा एकत्र घरातून बाहेर पडले, तेव्हा सर्वांचेच हृदय हेलावून गेले, त्यामुळे नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. त्याचवेळी उपस्थित स्थनिकांचे डोळे पाणावले होते. कुटुंब प्रमुख असलेल्या मनोजच्या या निर्णयाबाबत सर्वजण आपापली बाजू मांडत होते. मनोज यांचे धाकटे जावई खुसरुपूर येथील रहिवासी आशिष मिश्रा यांनी पाचही मृतदेहांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित शेकडो लोकांचे डोळे पाणावले. सीओ अजय कुमार, एसएचओ प्रसंजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येने सावकारांची दहशत चव्हाट्यावर येत आहे. तीन लाखांच्या कर्जाच्या व्याजासह 18 लाखांची मागणी सावकाराने केली होती. यासाठी कुटुंबाला त्रास दिला जात होता. मृत मनोजची मोठी मुलगी काजल हिने पोलिसांना सांगितले की, माझ्या लग्नात आजोबांनी गावातील एका व्यक्तीकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. तो व्याज जोडून माझ्या आजोबा आणि वडिलांकडे १८ लाख रुपयांची मागणी करत होता. व्याज घेणारा रोज घरी येऊन शिवीगाळ करत असे. याला कंटाळून दादाने आधीच आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी एक कर्जदार वडिलांची ऑटो रिक्षा घेऊन गेला होता. त्यामुळे घरची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. वडिलांकडे दोन खोल्यांच्या झोपडीशिवाय काहीच नव्हते. घराजवळील एका छोट्या मोकळ्या जागेवरही लोकांनी कब्जा केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहारDeathमृत्यू