पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात मध्यरात्री पोलीस चौकीवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सीमावर्ती भागातील दोरांगला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिया गावात रात्री १ च्या सुमारास घडली. गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्व्हिस वेपन घटनास्थळावरून जप्त करण्यात आलं आहे.
वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथक मृतांचे फोन तपासत आहे, जेणेकरून घटनेशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतील. होमगार्ड अशोक कुमार आणि पंजाब पोलीसचे एएसआय (ASI) गुरनाम सिंह यांची हत्या झाली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरदासपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच गुरदासपूरचे एसएसपी आदित्य शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमनेही पाहणी केली. याशिवाय बीएसएफचे डीआयजी जेके विरदी हे देखील घटनास्थळी पोहोचले. एसएसपींनी सांगितले की, दोघे चौकीच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलने तपास करत आहेत.
या घटनेचा गँगस्टर आणि दहशतवादी अँगलने देखील तपास केला जात आहे, जेणेकरून कोणत्याही संभाव्य कटाची शक्यता नाकारता येणार नाही. याच दरम्यान, या घटनेवरून विरोधी पक्ष काँग्रेसने आम आदमी पार्टी सरकारच्या काळातील राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनी 'X' वर लिहिलं की, "गुरदासपूर जिल्ह्यातील अधियान गावात एका चेकपोस्टजवळ आमच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी या हत्येचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. आपल्या राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण संघटित राहायला हवं."
Web Summary : In Gurdaspur, Punjab, two police officers were fatally shot at a checkpoint in Adia village. Investigations are underway, exploring potential gang or terror links. Opposition Congress raises concerns about state security following the incident. Senior officials are investigating the case.
Web Summary : पंजाब के गुरदासपुर में एक चौकी पर दो पुलिसकर्मियों की गोली मारकर हत्या कर दी गई। जांच जारी है, जिसमें संभावित गिरोह या आतंकी संबंधों की तलाश की जा रही है। विपक्षी कांग्रेस ने घटना के बाद राज्य सुरक्षा पर चिंता जताई है। वरिष्ठ अधिकारी मामले की जांच कर रहे हैं।