शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:26 IST

रक्षाबंधन साजरे करण्यासाठी इंदूरहून कटनीला ट्रेनने प्रवास करणारी २९ वर्षीय अर्चना तिवारी १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे.

रक्षाबंधन दिवशी २९ वर्षीय अर्चना तिवारी बेपत्ता झाली होती.  ती १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे. मात्र, आता पोलिसांना तिच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे अर्चनाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. जीआरपीने ग्वाल्हेरच्या एका कॉन्स्टेबल राम तोमरला ताब्यात घेतले आहे. राम तोमरने अर्चना तिवारीसाठी तिकीट बुक केल्याचे उघड झाले आहे. अर्चनासोबत त्याचे काय संबंध आहे, त्याने इंदूरहून ग्वाल्हेरला तिकीट का बुक केले आणि त्याला अर्चनाचे गुपित माहित आहे का, हे जाणून घेण्यासाठी तोमरची चौकशी केली जात आहे.

अर्चनाच्या कुटुंबाने मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला होता. तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्याची मागणी केली होती. इंदूर उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनने कटनीला रवाना झाली. अर्चनाचे शेवटचे ठिकाण भोपाळमधील राणी कमलापती स्टेशनवर सापडले, त्यानंतर तिच्या कुटुंबाने राणी कमलापती जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली.

इटारसी रेल्वेस्थानकावर शेवटचे लोकेशन

पोलिसांनी राणी कमलापती रेल्वे स्थानकापासून ते इटारसी आणि कटनीपर्यंतच्या परिसरात कसून चौकशी केली आहे.  स्टेशन आणि आसपासच्या परिसरात बसवलेले सीसीटीव्ही स्कॅन केले, परंतु अद्याप अर्चनाचा कोणती माहिती लागलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपासच्या सर्व रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि ट्रॅव्हल एजन्सींना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तपासात प्रत्येक पैलू तपासला जात आहे, मग तो अपघात असो, अपहरण असो किंवा इतर कोणतेही कारण असो. अर्चनाचे शेवटचे ठिकाण इटारसी रेल्वे स्थानक असल्याचे आढळून आले आणि तिचा मोबाईल तिथे बंद होता.

काही लोकांनी तिला इटारसी रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये पाहिले आहे. त्यानंतर ती कुठे गेली, काय घडले. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान, आवश्यक तेथे इतर संबंधित एजन्सींची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अर्चनाच्या कुटुंबाने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला मानवी तस्करीचा गुन्हा म्हटले आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अर्चनाचे काका बाबू प्रकाश तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "हा मानवी तस्करीचे प्रकरण आहे परंतु पोलिस या दृष्टिकोनातून तपास करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस