शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:26 IST

रक्षाबंधन साजरे करण्यासाठी इंदूरहून कटनीला ट्रेनने प्रवास करणारी २९ वर्षीय अर्चना तिवारी १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे.

रक्षाबंधन दिवशी २९ वर्षीय अर्चना तिवारी बेपत्ता झाली होती.  ती १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे. मात्र, आता पोलिसांना तिच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे अर्चनाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. जीआरपीने ग्वाल्हेरच्या एका कॉन्स्टेबल राम तोमरला ताब्यात घेतले आहे. राम तोमरने अर्चना तिवारीसाठी तिकीट बुक केल्याचे उघड झाले आहे. अर्चनासोबत त्याचे काय संबंध आहे, त्याने इंदूरहून ग्वाल्हेरला तिकीट का बुक केले आणि त्याला अर्चनाचे गुपित माहित आहे का, हे जाणून घेण्यासाठी तोमरची चौकशी केली जात आहे.

अर्चनाच्या कुटुंबाने मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला होता. तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्याची मागणी केली होती. इंदूर उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनने कटनीला रवाना झाली. अर्चनाचे शेवटचे ठिकाण भोपाळमधील राणी कमलापती स्टेशनवर सापडले, त्यानंतर तिच्या कुटुंबाने राणी कमलापती जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली.

इटारसी रेल्वेस्थानकावर शेवटचे लोकेशन

पोलिसांनी राणी कमलापती रेल्वे स्थानकापासून ते इटारसी आणि कटनीपर्यंतच्या परिसरात कसून चौकशी केली आहे.  स्टेशन आणि आसपासच्या परिसरात बसवलेले सीसीटीव्ही स्कॅन केले, परंतु अद्याप अर्चनाचा कोणती माहिती लागलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपासच्या सर्व रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि ट्रॅव्हल एजन्सींना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तपासात प्रत्येक पैलू तपासला जात आहे, मग तो अपघात असो, अपहरण असो किंवा इतर कोणतेही कारण असो. अर्चनाचे शेवटचे ठिकाण इटारसी रेल्वे स्थानक असल्याचे आढळून आले आणि तिचा मोबाईल तिथे बंद होता.

काही लोकांनी तिला इटारसी रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये पाहिले आहे. त्यानंतर ती कुठे गेली, काय घडले. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान, आवश्यक तेथे इतर संबंधित एजन्सींची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अर्चनाच्या कुटुंबाने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला मानवी तस्करीचा गुन्हा म्हटले आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अर्चनाचे काका बाबू प्रकाश तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "हा मानवी तस्करीचे प्रकरण आहे परंतु पोलिस या दृष्टिकोनातून तपास करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस