शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:26 IST

रक्षाबंधन साजरे करण्यासाठी इंदूरहून कटनीला ट्रेनने प्रवास करणारी २९ वर्षीय अर्चना तिवारी १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे.

रक्षाबंधन दिवशी २९ वर्षीय अर्चना तिवारी बेपत्ता झाली होती.  ती १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे. मात्र, आता पोलिसांना तिच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे अर्चनाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. जीआरपीने ग्वाल्हेरच्या एका कॉन्स्टेबल राम तोमरला ताब्यात घेतले आहे. राम तोमरने अर्चना तिवारीसाठी तिकीट बुक केल्याचे उघड झाले आहे. अर्चनासोबत त्याचे काय संबंध आहे, त्याने इंदूरहून ग्वाल्हेरला तिकीट का बुक केले आणि त्याला अर्चनाचे गुपित माहित आहे का, हे जाणून घेण्यासाठी तोमरची चौकशी केली जात आहे.

अर्चनाच्या कुटुंबाने मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला होता. तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्याची मागणी केली होती. इंदूर उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनने कटनीला रवाना झाली. अर्चनाचे शेवटचे ठिकाण भोपाळमधील राणी कमलापती स्टेशनवर सापडले, त्यानंतर तिच्या कुटुंबाने राणी कमलापती जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली.

इटारसी रेल्वेस्थानकावर शेवटचे लोकेशन

पोलिसांनी राणी कमलापती रेल्वे स्थानकापासून ते इटारसी आणि कटनीपर्यंतच्या परिसरात कसून चौकशी केली आहे.  स्टेशन आणि आसपासच्या परिसरात बसवलेले सीसीटीव्ही स्कॅन केले, परंतु अद्याप अर्चनाचा कोणती माहिती लागलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपासच्या सर्व रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि ट्रॅव्हल एजन्सींना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तपासात प्रत्येक पैलू तपासला जात आहे, मग तो अपघात असो, अपहरण असो किंवा इतर कोणतेही कारण असो. अर्चनाचे शेवटचे ठिकाण इटारसी रेल्वे स्थानक असल्याचे आढळून आले आणि तिचा मोबाईल तिथे बंद होता.

काही लोकांनी तिला इटारसी रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये पाहिले आहे. त्यानंतर ती कुठे गेली, काय घडले. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान, आवश्यक तेथे इतर संबंधित एजन्सींची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अर्चनाच्या कुटुंबाने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला मानवी तस्करीचा गुन्हा म्हटले आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अर्चनाचे काका बाबू प्रकाश तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "हा मानवी तस्करीचे प्रकरण आहे परंतु पोलिस या दृष्टिकोनातून तपास करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस