शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"त्याने पप्पांचं तोंड उशीने दाबलं, मम्मी पाहत राहिली"; १० वर्षांच्या लेकाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:38 IST

वीरू आणि अनिताच्या १० वर्षांच्या मुलाने त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.

अलवरच्या खेडलीतील वीरू हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी वीरूची पत्नी अनिता राज, तिचा बॉयफ्रेंड काशी प्रजापत आणि ब्रिजेश जाटव यांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वीरू आणि अनिताच्या १० वर्षांच्या मुलाने त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.

मुलाने दिलेल्या माहितीनुसार, "रात्री पप्पा घरी आल्यावर त्यांनी फोन चार्ज करायला सांगितला. त्यानंतर मी त्यांचा फोन चार्ज करायला लावला आणि नंतर टीव्ही पाहू लागलो. पण आई अनिताने मला जबरदस्तीने झोपवलं. आई म्हणाली की, तू सकाळी उठत नाहीस. मात्र झोपलेलो असताना लोकांचा आवाज आणि बेडच्या आवाजामुळे मी अचानक जागा झालो. यानंतर मी पाहिलं की त्याने पप्पांचं तोंड उशीने दाबलं आणि मम्मी उभं राहून हे सर्व पाहत होती."

"उशीने तोंड दाबल्यानंतर, पप्पांचा गळाही दाबण्यात आला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्याने पप्पांच्या मानेवर आणि चेहऱ्यावरही ठोसा मारला. गुन्हा केल्यानंतर तो तेथून निघून गेला."  १० वर्षांच्या मुलाने दिलेल्या माहितीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

मुलाने असंही सांगितलं की जेव्हा जेव्हा त्याचे वडील खेडलीमधून बाहेर जायचे तेव्हा त्याच्या आईचा बॉयफ्रेंड काशी घरी यायचा आणि घरीच राहायचा. मुलगा आता त्याच्या वडिलांना मिस करत आहे आणि तो पोलिसांना आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक