शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 14:36 IST

Alirajpur Case: आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी दिल्लीतील बुरारीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते.

Alirajpur Mass Suicide Case : आजच्याच दिवशी, म्हणजेच 1 जुलै 2018 रोजी दिल्लीतील बुरारी येथे झालेल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता तशाच प्रकारची घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. ही हत्या की सामूहिक आत्महत्या? हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. 

अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली. मृतांमध्ये घरातील प्रमुख राकेश, त्याची पत्नी ललिता आणि मुलगी लक्ष्मी, दोन मुले अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बुरारी घटनेत काय झाले?दिल्लीतील बुरारी येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. आज 1 जुलै रोजी या घटनेला 6 वर्षे पूर्ण झाली. 30 जून 2018 रोजी रात्री उशिरा 12 ते 1 वाजेच्या सुमारास चुंडावत उर्फ भाटिया कुटुंबातील 11 जणांनी एकाचवेळी एकाच पद्धतीने सामूहिक आत्महत्या केली होती. दहा जण लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, तर कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य असलेल्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै 2018 रोजी त्या सर्वांच्या मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. बुरारी प्रकरणात असा दावा करण्यात येतो की, कुटुंबप्रमुख ललित भाटिया याने जादूटोण्याच्या प्रभावाखाली संपूर्ण कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करण्यास भाग पाडले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू