शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

Aligarh Poison Liquor : धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने घेतला तब्बल 85 जणांचा बळी; 33 जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:33 IST

85 dead in Aligarh Poisonous Liquor Case : करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने 85 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल 85 जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने (Aligarh Poison Liquor) 85 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारूचं हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र तो बंद झाला नाही आणि आता 85 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अलीगडमधील करसुआ गावात विषारी देशी दारूची विक्री केली जात आहे. गावकऱ्यांनी लेखी तक्रार (Written Complaint) दिल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. करसुआ गावचे सरपंच रितेश उपाध्याय यांनी स्वतः याबाब उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केली होती (Complaint To Liquor Shop). यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या दारूच्या दुकानाला क्लिन चिट दिली. आता येथील दारूने अनेक लोकांचे जीव घेतलेत.गावच्या सरपंचांनी त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीची एक कॉपी असल्याचं देखील म्हटलं आहे. आधी तक्रार देऊनही कारवाई न करणारं प्रशासन इतक्या लोकांच्या मृत्यूनंतर आता खडबडून जागं झालं आहे. 

मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक

विषारी दारू मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक केली आहे. यामध्ये 50-50 हजार रुपयांचं बक्षीस असलेल्या काही गुन्हेगारांचा देखील समावेश आहे. एसएसपी कलानिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुराव्यांच्या आधारे छापेमारी करत आहे. अवैध दारू निर्मितीत वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत."

"विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 84 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना होऊन 4 दिवस झालेत. तेव्हापासून दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे." अनेकजण अद्याप रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. मात्र, सरकारवर आता मृत्यूची आकडेवारी लपवला जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने आतापर्यंत केवळ 25 मृत्यूची माहिती दिलीय. याशिवाय झालेले मृत्यू संशयास्पद आहेत असून या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूliquor banदारूबंदी