शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

Aligarh Poison Liquor : धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने घेतला तब्बल 85 जणांचा बळी; 33 जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:33 IST

85 dead in Aligarh Poisonous Liquor Case : करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने 85 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल 85 जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने (Aligarh Poison Liquor) 85 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारूचं हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र तो बंद झाला नाही आणि आता 85 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अलीगडमधील करसुआ गावात विषारी देशी दारूची विक्री केली जात आहे. गावकऱ्यांनी लेखी तक्रार (Written Complaint) दिल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. करसुआ गावचे सरपंच रितेश उपाध्याय यांनी स्वतः याबाब उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केली होती (Complaint To Liquor Shop). यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या दारूच्या दुकानाला क्लिन चिट दिली. आता येथील दारूने अनेक लोकांचे जीव घेतलेत.गावच्या सरपंचांनी त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीची एक कॉपी असल्याचं देखील म्हटलं आहे. आधी तक्रार देऊनही कारवाई न करणारं प्रशासन इतक्या लोकांच्या मृत्यूनंतर आता खडबडून जागं झालं आहे. 

मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक

विषारी दारू मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक केली आहे. यामध्ये 50-50 हजार रुपयांचं बक्षीस असलेल्या काही गुन्हेगारांचा देखील समावेश आहे. एसएसपी कलानिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुराव्यांच्या आधारे छापेमारी करत आहे. अवैध दारू निर्मितीत वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत."

"विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 84 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना होऊन 4 दिवस झालेत. तेव्हापासून दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे." अनेकजण अद्याप रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. मात्र, सरकारवर आता मृत्यूची आकडेवारी लपवला जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने आतापर्यंत केवळ 25 मृत्यूची माहिती दिलीय. याशिवाय झालेले मृत्यू संशयास्पद आहेत असून या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूliquor banदारूबंदी