शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य पण... उतावीळ मध्यमवर्ग अन् एन्काउंटरचे राजकारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 10:28 IST

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य आहे. बदलापूर स्थानकात नागरिकांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा जनसमुदाय फाशी...फाशी... असे ओरडत होता.

- संदीप प्रधानवरिष्ठ सहायक संपादक

बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काउंटर केले. शिंदेबाबत झालेल्या झटपट न्यायाचे अनेक ठिकाणी पेढे वाटून व बॅनर लावून स्वागत केले गेले. राजकीय नेत्यांनी राजकीय अभिनिवेशातून अशा भूमिका घेणे स्वाभाविक आहे; परंतु समाजातील मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग जेव्हा अशी भूमिका घेतो, तेव्हा ते धक्कादायक आणि धोकादायकही आहे. पुण्यातील नागरिकांचे जनप्रबोधिनी फाउंडेशन या संस्थेने सर्वेक्षण केले. त्यात ज्येष्ठ नागरिकांनी संसद व न्यायसंस्थेचा अंकुश नसलेला कणखर नेता देश अधिक उत्तम चालवील, असा हुकूमशाहीच्या बाजूने कौल दिला. ठाणे असो वा पुणे, ही मध्यमवर्गीय लोकसंख्येची केंद्रे असून, त्यांच्या या उतावीळ भावनेच्या लाटेवर एन्काउंटर व हुकूमशाहीचे समर्थन करणाऱ्या राजकारण्यांना स्वार होणे सोपे होणार आहे.

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य आहे. बदलापूर स्थानकात नागरिकांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा जनसमुदाय फाशी...फाशी... असे ओरडत होता. याचा अर्थ न्यायप्रक्रिया पूर्ण करून अक्षयला फासावर लटकवा ही जनभावना होती. मात्र, न्यायप्रक्रियेत कदाचित अक्षयला कठोर शिक्षा होण्यास दहा ते पंधरा वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ लागला असता. मात्र, तत्पूर्वीच बंदुकीच्या गोळीने त्याचा वेध घेतला. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला. ‘मम्मी भूक लगी हैं... बस दो मिनिट’, असे म्हणत आई मुलांना मॅगी खाऊ घालते, म्हणजे भूक लागल्यावर दोन मिनिटांत समोर खाद्यपदार्थ आलेच पाहिजेत, अशी मानसिकता मुलांची तयार झाली. आपल्या जीवनात व समाजात जे व्हायला हवे ते त्वरित व्हायला हवे. झटपट पदवी, पैसा, मानमरातब मिळवण्याची आस मध्यमवर्गात कमालीची वाढली आहे. एकेकाळी दिवाळीत रेशनवर मिळणारी एक किलो साखर मिळवण्याकरिता दिवसभर रांगेत उभा राहणारा, गावाकडील जमिनीच्या वादाचे दोन-तीन पिढ्या चालणारे खटले श्रद्धापूर्वक लढवणारा, चिकाटीने परीक्षा देणारा, महागाईविरोधात लढे देणारा, हाच का तो मध्यमवर्ग, असा प्रश्न आता पडतो.

त्याचवेळी न्याय होण्यास होणारा विलंब दुर्दैवी आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त आहेत. देशभरातील २५ उच्च न्यायालयांमधील ३६५ पदे रिक्त आहेत. देशभरातील उच्च न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या ६० लाखांहून अधिक आहे. त्यापैकी दोन लाख ४५ हजार प्रकरणे २० ते ३० वर्षे जुनी आहेत. उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या सहा लाख आहे. कनिष्ठ न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे ५३ लाख आहेत. समाजातील श्रीमंत व अतिश्रीमंत वर्ग सरकारी धोरणे आपल्याला अनुकूल बनवण्यासाठी वा धोरणांतून पळवाटा शोधण्यात मश्गूल असतो. गोरगरीब वर्गासमोर दैनंदिन जगण्याचे प्रश्न बिकट असतात. समाजातील सुशिक्षित, बोलका मध्यमवर्गाकडे पाहून सरकारी धोरणे ठरतात. तोच वर्ग उतावीळ होऊन लोकशाहीविरोधी भूमिकांचे समर्थन करू लागला, तर अनर्थ ओढवेल.

टॅग्स :badlapurबदलापूर