शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य पण... उतावीळ मध्यमवर्ग अन् एन्काउंटरचे राजकारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 10:28 IST

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य आहे. बदलापूर स्थानकात नागरिकांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा जनसमुदाय फाशी...फाशी... असे ओरडत होता.

- संदीप प्रधानवरिष्ठ सहायक संपादक

बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काउंटर केले. शिंदेबाबत झालेल्या झटपट न्यायाचे अनेक ठिकाणी पेढे वाटून व बॅनर लावून स्वागत केले गेले. राजकीय नेत्यांनी राजकीय अभिनिवेशातून अशा भूमिका घेणे स्वाभाविक आहे; परंतु समाजातील मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग जेव्हा अशी भूमिका घेतो, तेव्हा ते धक्कादायक आणि धोकादायकही आहे. पुण्यातील नागरिकांचे जनप्रबोधिनी फाउंडेशन या संस्थेने सर्वेक्षण केले. त्यात ज्येष्ठ नागरिकांनी संसद व न्यायसंस्थेचा अंकुश नसलेला कणखर नेता देश अधिक उत्तम चालवील, असा हुकूमशाहीच्या बाजूने कौल दिला. ठाणे असो वा पुणे, ही मध्यमवर्गीय लोकसंख्येची केंद्रे असून, त्यांच्या या उतावीळ भावनेच्या लाटेवर एन्काउंटर व हुकूमशाहीचे समर्थन करणाऱ्या राजकारण्यांना स्वार होणे सोपे होणार आहे.

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य आहे. बदलापूर स्थानकात नागरिकांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा जनसमुदाय फाशी...फाशी... असे ओरडत होता. याचा अर्थ न्यायप्रक्रिया पूर्ण करून अक्षयला फासावर लटकवा ही जनभावना होती. मात्र, न्यायप्रक्रियेत कदाचित अक्षयला कठोर शिक्षा होण्यास दहा ते पंधरा वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ लागला असता. मात्र, तत्पूर्वीच बंदुकीच्या गोळीने त्याचा वेध घेतला. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला. ‘मम्मी भूक लगी हैं... बस दो मिनिट’, असे म्हणत आई मुलांना मॅगी खाऊ घालते, म्हणजे भूक लागल्यावर दोन मिनिटांत समोर खाद्यपदार्थ आलेच पाहिजेत, अशी मानसिकता मुलांची तयार झाली. आपल्या जीवनात व समाजात जे व्हायला हवे ते त्वरित व्हायला हवे. झटपट पदवी, पैसा, मानमरातब मिळवण्याची आस मध्यमवर्गात कमालीची वाढली आहे. एकेकाळी दिवाळीत रेशनवर मिळणारी एक किलो साखर मिळवण्याकरिता दिवसभर रांगेत उभा राहणारा, गावाकडील जमिनीच्या वादाचे दोन-तीन पिढ्या चालणारे खटले श्रद्धापूर्वक लढवणारा, चिकाटीने परीक्षा देणारा, महागाईविरोधात लढे देणारा, हाच का तो मध्यमवर्ग, असा प्रश्न आता पडतो.

त्याचवेळी न्याय होण्यास होणारा विलंब दुर्दैवी आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त आहेत. देशभरातील २५ उच्च न्यायालयांमधील ३६५ पदे रिक्त आहेत. देशभरातील उच्च न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या ६० लाखांहून अधिक आहे. त्यापैकी दोन लाख ४५ हजार प्रकरणे २० ते ३० वर्षे जुनी आहेत. उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या सहा लाख आहे. कनिष्ठ न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे ५३ लाख आहेत. समाजातील श्रीमंत व अतिश्रीमंत वर्ग सरकारी धोरणे आपल्याला अनुकूल बनवण्यासाठी वा धोरणांतून पळवाटा शोधण्यात मश्गूल असतो. गोरगरीब वर्गासमोर दैनंदिन जगण्याचे प्रश्न बिकट असतात. समाजातील सुशिक्षित, बोलका मध्यमवर्गाकडे पाहून सरकारी धोरणे ठरतात. तोच वर्ग उतावीळ होऊन लोकशाहीविरोधी भूमिकांचे समर्थन करू लागला, तर अनर्थ ओढवेल.

टॅग्स :badlapurबदलापूर