शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

आदिवासी युवकांच्या मृत्यूनंतर पोलीस आक्रमक, आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:01 IST

मुख्य आरोपीचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय. तर, सहआरोपी अमरचंद याचेही घर तोडण्यात आले आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र गुर्जर याची पत्नी गावची सरपंच आहे.

ठळक मुद्देनीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हैय्या भील नावाच्या आदिवासी युवकाबाबत ही घटना घडली होती. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली.

भोपाळ - मध्य प्रदेशातील नीमच इथं माणुसकीला काळीमा फासणारी भयानक घटना घडली. येथील एका गरीब आदिवासी युवकाला काही टवाळखोरांनी उघडपणे पिकअप वाहनाच्या मागे बांधून फरफटत नेलं. या घटनेत ८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील ४ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ज्यात मुख्य आरोपीचाही समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. 

नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हैय्या भील नावाच्या आदिवासी युवकाबाबत ही घटना घडली होती. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली. त्यानंतर आदिवासी युवक भील याला बांधून ओढत मारहाण केली. या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २६ ऑगस्टला ही निर्दयी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. त्यातील, मुख्य आरोपीचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय. तर, सहआरोपी अमरचंद याचेही घर तोडण्यात आले आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र गुर्जर याची पत्नी गावची सरपंच आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्यासह इतरही गुन्हे दाखल केले आहेत. 

प्रमुख आरोपींना अटक 

नीमच घटनेबाबत एसपी सूरज कुमार वर्मा यांनी माहिती दिली की, या घडलेल्या घटनेनंतर ८ जणांना आरोपी बनवण्यात आले आहेत. ज्यात प्रमुख आरोपी छीतरमल गुर्जर, महेंद्र गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिकअप गाडी चालक आणि सहचालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून बाकी आरोपींनाही लवकरात लवकर पकडलं जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

काँग्रेसनं साधला निशाणा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबाबत ट्विट करत म्हटलंय की, मध्य प्रदेशात हे काय चाललंय? नीमच जिल्ह्यात आदिवासी युवकाला बेदम मारहाण केली जाते. चोरीच्या संशयावरुन त्याला इतकं निर्दयी मारहाण करून एका वाहनाच्या सहाय्याने ओढत नेलं जातं. त्यात या युवकाचा मृत्यू होतो. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे राज्यात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. लोकं बिनधास्तपणे कायदा हातात घेत आहेत. कायद्याची भीती उरली नाही. सरकार नावाची गोष्टही दिसून येत नाही. अशा घटनांना तात्काळ रोखलं पाहिजे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, काँग्रेसनं या घटनेच्या चौकशीसाठी समिती बनवली आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस