शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

आदिवासी युवकांच्या मृत्यूनंतर पोलीस आक्रमक, आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:01 IST

मुख्य आरोपीचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय. तर, सहआरोपी अमरचंद याचेही घर तोडण्यात आले आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र गुर्जर याची पत्नी गावची सरपंच आहे.

ठळक मुद्देनीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हैय्या भील नावाच्या आदिवासी युवकाबाबत ही घटना घडली होती. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली.

भोपाळ - मध्य प्रदेशातील नीमच इथं माणुसकीला काळीमा फासणारी भयानक घटना घडली. येथील एका गरीब आदिवासी युवकाला काही टवाळखोरांनी उघडपणे पिकअप वाहनाच्या मागे बांधून फरफटत नेलं. या घटनेत ८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील ४ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ज्यात मुख्य आरोपीचाही समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. 

नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हैय्या भील नावाच्या आदिवासी युवकाबाबत ही घटना घडली होती. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली. त्यानंतर आदिवासी युवक भील याला बांधून ओढत मारहाण केली. या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २६ ऑगस्टला ही निर्दयी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. त्यातील, मुख्य आरोपीचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय. तर, सहआरोपी अमरचंद याचेही घर तोडण्यात आले आहे. याप्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र गुर्जर याची पत्नी गावची सरपंच आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्यासह इतरही गुन्हे दाखल केले आहेत. 

प्रमुख आरोपींना अटक 

नीमच घटनेबाबत एसपी सूरज कुमार वर्मा यांनी माहिती दिली की, या घडलेल्या घटनेनंतर ८ जणांना आरोपी बनवण्यात आले आहेत. ज्यात प्रमुख आरोपी छीतरमल गुर्जर, महेंद्र गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिकअप गाडी चालक आणि सहचालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून बाकी आरोपींनाही लवकरात लवकर पकडलं जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

काँग्रेसनं साधला निशाणा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबाबत ट्विट करत म्हटलंय की, मध्य प्रदेशात हे काय चाललंय? नीमच जिल्ह्यात आदिवासी युवकाला बेदम मारहाण केली जाते. चोरीच्या संशयावरुन त्याला इतकं निर्दयी मारहाण करून एका वाहनाच्या सहाय्याने ओढत नेलं जातं. त्यात या युवकाचा मृत्यू होतो. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे राज्यात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. लोकं बिनधास्तपणे कायदा हातात घेत आहेत. कायद्याची भीती उरली नाही. सरकार नावाची गोष्टही दिसून येत नाही. अशा घटनांना तात्काळ रोखलं पाहिजे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, काँग्रेसनं या घटनेच्या चौकशीसाठी समिती बनवली आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस