शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोघांवर ऍसिड हल्ला; पुरुषाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 11:04 IST

जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलवरून मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास जेवण करून मोटारसायकलवरुन घरी परतत असताना कोणत्यातरी अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऍसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. वालीव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा हत्या, हत्येचा प्रयत्न अनोळखी आरोपी विरोधात दाखल केला असून तपास करत आहे. मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरात राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (41) आणि सिमा विश्वकर्मा (38) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यावर रात्री अडीचच्या दरम्यान मोटार सायकलवरून घरी परतण्यासाठी निघाल्यावर रस्ता क्रॉस करताना वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंप जवळील डिव्हायडर येथे थांबले असताना कोणत्यातरी कारणावरून अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऍसिड फेकुन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अविनाश तिवारी यांचा मृत्यू झाला असून सिमा ह्या गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. या ऍसिड हल्ला कोणी व का केला याचा शोध घेत आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू