शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

आचोळे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; एका टोळीच्या 7 सदस्यांना केले तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 16:34 IST

पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील आचोळे आणि तुळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, पैश्यासाठी अपहरण करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणाऱ्या एका टोळीच्या सात सदस्यांना सोमवारी आचोळे पोलिसांनी पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. एकाच दिवशी सात जणांना तडीपार केल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे. आगामी होणाऱ्या सणानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात हे सात आरोपी कधी एकत्र टोळी करून गुन्हे करायचे तर कधी एकटे एकटे या टोळीतील युवकांविरुध्द आचोळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होऊन या गुंडांच्या टोळीस पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये टोळी प्रमुख अजय अमोद मिश्रा (२४), टोळी सदस्य जगन मायंडी पटकटीयार (२०), प्रिषीत उर्फ दीपिका श्रीमोहन पाल (२३), सनी उर्फ अभिषेक महेंद्र टाक (२४), हर्षल दिलीप राठोड (१९), मोहम्मद करीम शकील शेख (२१) आणि राहुल उर्फ टीका रमेश सावंत (२२) यांचा समावेश आहे.’या टोळीतील युवकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव सुरूच होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे तुळींज आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणुन त्यांच्यावर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुली-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल जाधव, दत्तात्रय जाधव आणि बुधवंत लोंढे, पोलीस हवालदार प्रशांत सावदेकर, संदीप बडगुजर, उमेश महाले यांनी पार पाडली.

एका टोळीच्या सात सदस्यांना पोलीस उपायुक्तांनी सोमवारी तडीपार करण्यात आले आहे. या सातही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे तडीपार आरोपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसल्यास पोलीस ठाण्याशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. - बाळासाहेब पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस