शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

शिक्षा भोगल्यावर आरोपी निघाला निर्दोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 14:35 IST

हायकोर्टाचा निर्णय : खटल्यात त्रुटी राहिल्याचे कारण

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीने १३ आॅक्टोबर २००९ रोजी पहाटे स्वत:ला जाळून घेऊन राहत्या घराच्या अंगणात आत्महत्या केली होती. हा निकाल होईपर्यंत मधुकरचा १० वर्षांचा तुरुंगवास भोगून जवळपास पूर्ण झाला होता.

मुंबई - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणे आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा गुन्ह्यांसाठी सत्र न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील एका आरोपीची अपिलात निर्दोष सुटका केली आहे.रासगाव येथील मधुकर बसवंत बरोरा या तरुणास कल्याण येथील सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध त्याने केलेले अपील मंजूर करून न्या. साधना जाधव यांनी त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र गुन्हेगारीचा कलंक पुसला जाण्याखेरीज या निकालाचा मधुकरला अन्य काही फायदा झाला नाही. कारण हा निकाल होईपर्यंत मधुकरचा १० वर्षांचा तुरुंगवास भोगून जवळपास पूर्ण झाला होता.मधुकरच्याच वस्तीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने १३ आॅक्टोबर २००९ रोजी पहाटे स्वत:ला जाळून घेऊन राहत्या घराच्या अंगणात आत्महत्या केली होती. ८२ टक्के भाजलेल्या या मुलीचा ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १९ आॅक्टोबर २००९ रोजी मृत्यू होण्यापूर्वी तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीच्या आधारे गुन्हा नोंदवून मधुकरवर हा खटला दाखल झाला होता. प्रामुख्याने या मृत्यूपूर्व जबानीच्या आधारेच सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती.अपिलाच्या सुनावणीत न्या. जाधव यांनी अभियोग पक्षाचे अनेक साक्षी-पुरावे अविश्वसनीय वाटत असल्याचे नमूद केले. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व साक्षीपुरावे झाल्यावर दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अन्वये स्वत: न्यायाधीश आरोपीला अनेक प्रश्न विचारून त्याचे म्हणणे नोंदवून घेतात; त्या टप्प्याला या खटल्यात मूलगामी अनियमितता झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सत्र न्यायाधीशांनी मधुकरला त्याच्याविरुद्ध मयत मुलीने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीची सविस्तरपणे माहितीच दिली नव्हती. त्यामुळे त्याला त्याचे खंडन करण्याची परिणामकारक संधीच मिळाली नाही. न्या. जाधव यांनी म्हटले की, खटल्यातील ही त्रुटी दूर करण्यासाठी तो पुन्हा सत्र न्यायालयाकडे परत पाठवून काहीच साध्य होणार नाही. कारण त्या न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा मधुकरने भोगून पूर्ण केली आहे. अशा स्थितीत अपील मंजूर करून आरोपीस निर्दोष मुक्त करणे हाच मार्ग उरतो.

दिरंगाईमुळे झाला आयुष्याचा विचका

व्यवसायाने सुतार व अशिक्षित असलेल्या मधुकरच्या आयुष्याची १० बहुमोल वर्षे न्यायालयीन दिरंगाईमुळे न केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेपोटी तुरुंगात गेली. कल्याणच्या न्यायालयाने निकाल दिल्यानंतर वर्षभरात मधुकरने उच्च न्यायालयात अपील केले. ते रीतसर नोंदले गेल्यानंतर काही दिवसांतच न्या. जाधव यांनी ते सुनावणीसाठी दाखल केले. ते अंतिम सुनावणीस येऊन त्याचा निकाल होईपर्यंत आणखी पाच वर्षे गेली. खरेतर, उच्च न्यायालयात तुरुंगात असलेल्या आरोपींच्या अपिलांची वेगळी वर्गवारी केली जाते. दुर्दैवाने मधुकरच्या बाबतीत तसे घडले नाही. सुरुवातीस अपील दाखल केले तेव्हा मधुकरने स्वत:चा वकील केला होता. नंतर त्याला सरकारतर्फे अ‍ॅड. श्रद्धा सावंत या वकील देण्यात आल्या. त्यांनी केलेल्या उत्तम कामाची न्या. जाधव यांनी आवर्जून नोंद घेतली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयRapeबलात्कारKidnappingअपहरणPoliceपोलिस