शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दरोड्यातील १९ वर्षे फरारी आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:29 IST

कोयत्याने वार करुन सोन्याच्या व्यापाऱ्याला होते लुटले

पुणे : पुण्यात येऊन सोने विकून परत मुंबईला जात असताना व्यापाºयावर कोयत्याने वार करुन दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीपैकी एकाला तब्बल १९ वर्षांनंतर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़. राजू जगन्नाथ गायकवाड (वय ४५, रा़ दिवे, ता़ पुरंदर) असे त्याचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की,  इंदरमल जैन (वय ४२, रा. परळ, मुंबई) हे २२  मार्च २००० रोजी हे सोने विक्रीसाठी मुंबईहून पुण्यात आले होते़. व्यापाºयांना सोने विकल्यानंतर ते रात्री पावणे आठच्या सुमारास जमा झालेले पैसे घेऊन रिक्षाने पुणे स्टेशनला जात होते़. त्यावेळी रास्तापेठ येथील ताराचंद हॉस्पिटलच्या समोर काही जणांनी रिक्षा अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून चॉपर व कोयत्याने वार केला़. त्यांच्याकडील १ लाख ८६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने पळून नेली होती़. याप्रकरणी त्याचे भागीदार अशोककुमार जैन (रा़. काळा चौकी, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समर्थ पोलिस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील काही जणांना पोलिसांनी अटक केली होती़. मात्र, राजू गायकवाड हा पोलिसांना गुंगारा देत होता़ गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकातील कर्मचारी हद्दीत गस्तीवर असताना अमोल पवार यांना बातमी मिळाली की, अनेक दिवसापासून एका गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गायकवाड हा कनक हॉटेलच्या समोर शंकरशेठ रोडवर उभा आहे. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजू गायकवाड सांगितले. तसेच त्याच्याकडे समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत विचारले असताना त्याने व्यापाऱ्याला लुटल्याची कबुली देत तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याचे सांगितले.ही कामगिरी पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी योगेश जगताप, अमोल पवार, वैभव स्वामी, अजय थोरात, अनिल घाडगे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक